
Tej Police Times
खवळलेला समुद्र, बोटीत शिरलेले पाणी, समोरच मृत्यूचे भय; कोस्टगार्डच हेलिकॉप्टर ठरले देवदूत
नारळी पौर्णिमा झाली असली तरी समुद्रातील वातावरण पोषक नाही समुद्र खवळलेला आहे. रत्नागिरी जवळ पूर्णगड जवळ खवळलेल्या समुद्रात एका बोटीत दोन खलाशी अडकल्याची धक्कादायक घटना घडली. गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कोस्टगार्डला माहिती मिळाली तात्काळ कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरने दोघांचेही सुखरूप बचावकार्य केले अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. रत्नागिरी येथून सेकंडहॅन्ड बोट खरेदी करून दोन्ही खलाशी कर्नाटकच्या दिशेने जात होते. त्याचवेळी आपत्कालीन प्रसंग त्यांच्यावरती ओढवला होता. मात्र कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरने रेस्क्यू करत त्यांचे प्राण वाचवले आहेत.
Vasai Virar News: वसईतील किनाऱ्यावर बोटी पुन्हा विसावल्या; वादळी वाऱ्यामुळे मासेमारी पुन्हा बंद
विनोद भागवत नामक मालकाची ही नौका असल्याची माहिती मिळाली आहे. नौका लोखंडी असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. मासेमारी नौकेवर दोन खलाशी होते. पूर्णगड समुद्रात १२ वाव अंतरावर नौका मासेमारी करत होती. यावेळी समुद्रातील वातावरण खराब झाल्याने बोटीत पाणी भरण्यास सुरुवात झाली. बोटीत पाणी भरण्यास सुरुवात होताच बोटीतील खलाशांनी तत्काळ बोटीवर चढून मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. त्यानंतर मत्स्य विभागाशी संपर्क केला होता. मत्स्य विभागाचे अधिकारी आनंद पालव यांनी बोटीवरील खलाशांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरच्या मदतीसाठी कोस्टगार्डच्या अधिकाऱ्यांजवळ संपर्क साधला. आपत्कालीन परिस्थितीत कोस्टगार्ड आणि मत्स्य विभागाने दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक करण्यात येत आहे.
लेखकाबद्दलप्रतीक्षा बनसोडेपत्रकारिता क्षेत्रातील पाच वर्षाचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सध्या डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी डीडी नॅशनल, लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये रिपोर्टर म्हणून काम केले आहे. झी २४ तासमध्ये डिजीटल टीममध्ये काम केलं आहे. राजकीय आणि सामजिक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.