
Tej Police Times
शिंदे नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गेल्यावर्षी कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दोन जेसीबीचा वापर करून काढला होता. त्यामुळे महाराजांचा अपमान आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. खरे तर त्यांना जोडे मारले पाहिजे अशी टीका शिंदे यांनी केली. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना दंगली झाल्या नसल्याचे वक्तव्य केले आहे त्यावर बोलताना शिंदे म्हणाले, लोकसभा निवडणुकीपूर्वी ते दंगलीची भाषा करत होते. महाराष्ट्र अशांत पाहिजे. जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांनी लोकसभेपूर्वी केला आहे. देशातील जनता सुज्ञ आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महायुती सरकार काम करत आहे. राज्य सरकार विकास कामांकडे लक्ष देत असताना महाविकास आघाडी मात्र दंगली घडवून आणत आहे असा आरोप शिंदे यांनी केला.
Mahavikas Aghadi Andolan: आम्ही फक्त आंदोलन करतोय, महाराजांचा काळ असता तर तुमचा कडेलोट केला असता, राऊतांचा संताप
लाडकी बहीण योजना गावागावात पसरल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काँग्रेसचे लोक या लाडक्या बहिणीच्या विरोधात आडवे झाले आहे. ही योजना बंद करण्यासाठी विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस नेत्यांच्या निकटवर्तीय असलेले कार्यकर्ते लाडकी बहीणच्या विरोधात न्यायालयात गेले आहे. पण, आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना न्यायालयातून न्याय मिळवून देणार. वेळ आली तर या लाडक्या बहिणी योजनेमध्ये खोडा घालणाऱ्यांना जोडा मारल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही शिंदे यांनी दिला.
उद्धव ठाकरेंचे सरकार शिवद्रोही होते, अफजलखानी कारभार करायचे; CM शिंदे यांचे ‘मविआ’वर गंभीर आरोप
उद्धव ठाकरे यांचे सरकार हे शिवद्रोही सरकार होते. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील नागरिकांनी सत्तेतून त्यांना बाहेर केल्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजाचे नाव घेतात आणि काम मात्र, अफजलखानाचे करतात. निवडणुका लढवण्यासाठी शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि निवडून आल्यावर अफजलखानी कारभार करायचा असे त्याचे धोरण आहे. महाविकास आघाडीच्या काळात खरोखरच महिला सुरक्षित होत्या का?. त्यांच्या काळातच नवनीत राणा यांना जेलमध्ये टाकले होते. कंगना राणावत यांचे घर तोडले होते. त्यांच्या कार्यकाळात महिलांवर सर्वाधिक अन्याय अत्याचार महिलांवर झाले आहे. त्यामुळे त्यांनी महिलांच्या सुरक्षेवर आणि शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा त्यांना अधिकार नाही असेही शिंदे म्हणाले.
लेखकाबद्दलप्रतीक्षा बनसोडेपत्रकारिता क्षेत्रातील पाच वर्षाचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सध्या डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी डीडी नॅशनल, लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये रिपोर्टर म्हणून काम केले आहे. झी २४ तासमध्ये डिजीटल टीममध्ये काम केलं आहे. राजकीय आणि सामजिक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.