
Tej Police Times
वनराज आंदेकर यांची हत्या करण्यासाठी त्यांच्या दोन्ही बहिणी आणि मेहुण्यांनी प्लॅन केला होता. संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती आहे, गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात संपत्तीच्या कारणावरुन वाद सुरु होते.
काल रात्री समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना कौटुंबीक वाद, संपत्तीचा वाद आणि जुन्या वादातून झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये मृताच्या दोन सख्ख्या बहिणी आणि मेहुण्यांचा समावेश आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी क्राइम ब्रांच आणि पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली आहेत. ते सापडल्यानंतर या घटनेचं मुख्य कारण समोर येणार आहे, अशी माहिती पुण्याचे आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिली आहे. याप्रकरणात वनराज आंदेकर यांच्या वडिलांनी तक्रार दाखल केली होती. त्यांनी या दोघींवर संशय व्यक्त केला होता. सर्वबाजुने तपास केला जाईल, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.
वनराजचे वडील बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर यांनी मुलींविरोधात तक्रार दाखल केली होती. आरोपींचा आकाश परदेशीसोबत वाद झाला होता. त्यानंतर आकाश परदेशी पोलिसांत पोहोचले. यावेळी शिवम आणि वनराज आंदेकर हे देखील पोलीस ठाण्यात पोहोचले, त्यावेळी संजीवनी (बहीण) व जयंत कोमकर (मेहुणा) यांनी आकाशला मारहाण केली. हे भांडण शिवम आंदेकर यांनी सोडवलं. तेव्हा बहीण संजीवनीने वनराज यांनी धमकी दिली. ‘वनराज, आम्ही तुला जगु देणार नाही. तु आमच्यामध्ये आला. तु आमचं दुकान पाडलं, आमच्या पोटावर पाय दिला, तुला आज पोरं बोलावून ठोकतेच’, अशी धमकी त्यांनी दिली होती. त्यानंतर वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. अतिक्रमक कारवाईमध्ये टपरी पडल्याचा रागातून हे घडल्याची माहिती आहे.
पुण्यात पहिलं टोळी युद्ध सुरू झाले ते आंदेकर आणि माळवदकर टोळीचं प्रमोद माळवदकरच्या वडिलांचा खुनाचा बदल म्हणून प्रमोद माळवदकरने बाळू आंदेकरला शिवाजीनगर कोर्टच्यात गोळ्या घातल्या होत्या. परंतु त्यानंतर प्रमोद माळवदकर याचा पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. बाळू आंदेकरच्या खुनानंतर आंदेकर टोळीचे सूत्र सूर्यकांत उर्फ बंडू अण्णा आंदेकरकडे गेली. माळवदकर आणि आंदेकर टोळी मध्ये ६ ते ७ जणांचा खून झाला होता.
माळवदकर टोळी नंतर संपुष्टात आली त्यानंतर सुरू झाली आंदेकर विरोध घिसाडी टोळी युद्ध घिसाडी गॅंगच्या संबंधित असल्याच्या पप्पू पडवळवर कॅम्प परिसरात जीव घेणे हल्ला झाला होता. त्या मागे आंदेकर टोळीचा हात असल्याचा समोर आलं. त्याचा बदल म्हणूम प्रतीवर घिसाडी गॅंगने देखील केले होते. मात्र हे युद्ध काहीसं थांबले असताना पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीमधील कोणत्या तरी एक सदस्याचा सभाग आल्याचं बोल जात आहे. हे प्रकरण अजून मिटलं नसून पोलिसांनी आरोपीला सुरक्षित जागेत ठेवलं आहे. पण गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या या टोळीची किनार जुन्या वादासोबत जोडीला गेली असल्याचं या विषयाच्या तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.