
Tej Police Times
आरक्षणाच्या मागणीसाठी गोंड-गोवारी समाजाने बुधवारी संविधान चौकात एकदिवसीय आंदोलन केले. तसेच 6 सप्टेंबरपर्यंत सरकारने त्यांच्या मागण्या मान्य न केल्यास 7 सप्टेंबरपासून पुन्हा बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा आदिवासी गोंड-गोवारी समाजाने पुन्हा एकदा दिला आहे.
आदिवासी गोंड-गोवारी समाजाच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे. याअंतर्गत पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आपल्या समर्थकांसह संविधान चौकात पोहोचले आणि त्यांनी आंदोलनावर बसलेल्या आंदोलकांची भेट घेतली. आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देत गोंड गोवारी समाजाला न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सर्वोतत्परी प्रयत्न करण्याचे आश्वासन आंबेडकरांनी दिले.
Pankaja Munde : आरक्षणासंदर्भात तुमची भूमिका काय? पंकजा मुंडेंचा शरद पवारांना सवाल
प्रकाश आंबेडकर म्हणाले, आतापर्यंत आदिवासी कधीही एकत्र आला नाही, त्याला एकमेकांचा विरोधात लढवण्यात आले. मागच्या दिड महिन्यापासून महाराष्ट्रातील सर्व आदिवासी एकत्र यावं असा प्रयत्न आमचा चाललेला आहे. सर्वजण एकत्र येऊन आपण आदिवासी म्हणून लढा सुरवात केला पाहिजे असा मानस त्यामध्ये घेण्यात आला. आपल्यातील मतभेद बाजूला ठेऊन आपण लढलं पाहिजे असे आंबेडकर म्हणाले.
पुढे बोलतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले, येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील ओबीसी संघटना एकत्र येताना आपल्याला दिसतील आणि वंचित बहुजन आघाडी त्यांना एकत्र आणण्यामध्ये पुढाकार घेत आहे. आणि तिथे एक चर्चा सुरवात झाली टि.पी. एरिया मधलेच आदिवासींना उमेदवारी दिली जाते. पण ओटीपी एरिया जो आहे त्या ओटीपी एरियामध्ये आदिवासी असूनही त्याला उमेदवारी दिली जात नाही. अशातच आता या ठिकाणी निर्णय घेण्यात आला तो म्हणजे ओटीपी एरियामध्ये आदिवासींना उमेदवारी द्यायची आणि लढवायचं असा निर्णय झाला आहे. त्यामुळे एकंदरीत आदिवासी एकत्रित येण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. असे आंबेडकर म्हणाले.
लेखकाबद्दलअजित भाबडअजित भाबड, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. अजित यांनी आबासाहेब गरवारे कॉलेजमधून पत्रकारितेची मास्टर्स पदवी मिळवली आहे. त्यांना राजकीय, सामाजिक, अंतरराष्ट्रीय तसेच कृषी क्षेत्रातील विश्लेषणात्मक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.