तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

मृतदेहाकडूनही पूर ओसरण्याची प्रतीक्षा; नातेवाइकांचे रस्त्यातच जागरण, बुलढाण्यातील भीषण वास्तव

0 45

Buldhana News: पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने अखेर मृतदेह फाट्यावर असलेल्या एका घरात ठेवण्यात आला. तब्बल दहा तासांनी पूर ओसरला.

महाराष्ट्र टाइम्स
buldhana
म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा : जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. पूर आल्याने काही मार्गांवर वाहतूक बंद झाली. पळसखेड फाटा येथे एका मृतदेहासह नातेवाइकांना तब्बल दहा तास पूर ओसरण्याची प्रतीक्षा करावी लागली. २ सप्टेंबरच्या रात्रीपासून सकाळपर्यंत अडकून पडावे लागले होते.

मृतदेहानेही केली पूर ओसरण्याची प्रतीक्षा…
बुलढाणा तालुक्यातील पळसखेड भट ते फाटादरम्यान असलेल्या नदीला २ सप्टेंबरच्या सायंकाळी पूर आला. गावाचा आणि लगतच्या गावांशी संपर्क तुटला. रात्री पावसाचा जोर वाढल्याने पळसखेड तलावाच्या सांडव्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. परिणामी नदीच्या लहान पुलावरून पुराचे पाणी पाच फूट उंचावरून वाहू लागले. यातच गावातील सुरेश अवचितराव खंडागळे यांचा पुणे येथे मृत्य झाला. त्यांचा मृतदेह रात्री ९ वाजता रुग्णवाहिकेद्वारे आणण्यात आला. मात्र नदीला पूर आल्याने अडकून पडावे लागले. पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने अखेर मृतदेह फाट्यावर असलेल्या एका घरात ठेवण्यात आला. तब्बल दहा तासांनी पूर ओसरला. तरीही गुडघाभर पाण्यातून गावकऱ्यांनी सुरेश खंडागळे यांचा मृतदेह घरापर्यंत नेला. पुरात अडकून पडल्यामुळे फाट्यावर नातेवाइक आणि गावकऱ्यांना जागरण करावे लागले.

Pune Crime: मुठा नदीत सापडलेल्या ‘त्या’ मृतदेहाचं गूढ उलगडलं, एका गोष्टीवरुन भयंकर गुन्हा समोर, सख्ख्या भावानेच…
पुलाची उंची वाढवा
थोड्याशा पावसातही नदीच्या पुलावरून पाणी वाहते. पावसाळ्यात नेहमीच नागरिकांना पुराच्या समस्येला तोंड द्यावे लागते. याची शासन व प्रशासनाने दखल घेऊन पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी होत आहे.

मृतदेहाकडूनही पूर ओसरण्याची प्रतीक्षा; नातेवाइकांचे रस्त्यातच जागरण, बुलढाण्यातील भीषण वास्तव

पावसाने पिकाचं मोठं नुकसान
दोन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे नदी, नाल्यांना आलेल्या पुराचा १४५ गावांना फटका बसला. नदी काठावरील ११ हजार ६०९ हेक्टरवरील सोयाबीन, मका, कापूस, तूर, उडीद, मूग पिकांची नासाडी झाली. आठ तालुक्यांमधील १६ हजार ४२५ शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसल्याचा प्राथमिक अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे . पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यात कापूस, सोयाबीन आणि तुरीची लागवड केली जाते.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.