
Tej Police Times
मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. वातावरणात सतत बदल होताना दिसत आहेत. मात्र दोन दिवसांपासून महाराष्ट्रभरात पावासाने उघडीप घेतली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे शनिवारपासून पुढे चार दिवस महाराष्ट्रभरातील जवळपास सर्वच भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावासाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. किनारपट्टी भागात पावासाची जोर वाढेल, तसंच घाटावरही येत्या ४ दिवसांत चांगल्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
Parbhani Rain : मागील २४ तासांत परभणीत मुसळधार; जनजीवन विस्कळीत, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर
मराठवाडा, विदर्भात पावसाची स्थिती कायम राहणार असून विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याशिवाय परभणी, धाराशीव जिल्ह्यांमध्येही चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बीड, हिंगोली तसंच छत्रपती संभाजीनगर, जालन्यामध्येही मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
बाप्पाच्या आगमनाला पाऊसही स्वागताला; मुंबईत रिमझिम, पुणेही भिजणार, कोकण-मराठवाड्यातही बसरणार
या जिल्ह्यांसह मुंबई, पुण्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून पुण्याला शनिवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शहरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. पुण्यासह रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावासाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.