Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Mumbai Local: पश्चिम रेल्वेवर आठवडाभर लोकल खोळंबा, प्रवशांना वेगमर्यादेचा त्रास, कारण…

6

Mumbai Western Railway Local: ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान रात्रकालीन ब्लॉकमध्ये विरारकडे जाणाऱ्या धीम्या मार्गाची जोडणी करण्यात आली. सध्या सहाव्या मार्गिकेची अप-डाउन धीम्या मार्गाला जोडणीचे काम पूर्ण झाले आहे.

हायलाइट्स:

  • ‘परे’वर आठवडाभर लोकल खोळंबा
  • सहाव्या मार्गिकेच्या कामांमुळे वेग मंदावणार
  • गणेशभक्तांना दिलासा…
महाराष्ट्र टाइम्स
Mumbai Local: पश्चिम रेल्वेवर आठवडाभर लोकल खोळंबा, प्रवशांना वेगमर्यादेचा त्रास, कारण…
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : दीड दिवसांच्या गणरायाचे विसर्जन करून आज, सोमवारी कामावर निघालेल्या प्रवाशांना पश्चिम रेल्वेच्या वेगमर्यादेचा त्रास सहन करावा लागणार आहे. कांदिवली ते गोरेगावदरम्यान धीम्या मार्गावरील नव्या सहाव्या मार्गिकेची जोडणी पूर्ण झाली असून चर्चगेटकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावर सुरक्षेच्या कारणास्तव वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे. यामुळे आठवडाभर लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गाच्या उभारणीसाठी १० तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. शनिवार मध्यरात्री बारानंतर सुरू झालेला ब्लॉक रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत होता. या ब्लॉक कालावधीत चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलमार्गाला सहाव्या मार्गिकेची जोडणी देण्यात आली आहे. यामुळे या मार्गावर ताशी २० किमी ते ४५ किमी अशी टप्याटप्याने शिथिल होणारी वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे. सोमवारी चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या धीम्या लोकल ताशी २० किमी वेगाने धावणार आहेत. शनिवारपर्यंत वेग हळहळू ४५ किमीपर्यंत वाढवण्यात येणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पीएम मोदींच्या सभेसाठी अवैध मुरुम उत्खनन? कराळे मास्तरांनी अडवले ट्रक, पोलीसांकडून अटकेची धमकी

३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान रात्रकालीन ब्लॉकमध्ये विरारकडे जाणाऱ्या धीम्या मार्गाची जोडणी करण्यात आली. सध्या सहाव्या मार्गिकेची अप-डाउन धीम्या मार्गाला जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. येत्या काळात अप-डाउन जलद मार्गाला नव्या सहाव्या मार्गिकेच्या जोडणीचे काम करण्यात येणार आहे.

गणेशभक्तांना दिलासा

सोमवारी, १६ सप्टेंबरला ईद-ए-मिलादची सुट्टी आहे. मंगळवारी, १७ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. त्यापूर्वी १४-१५ सप्टेंबरला अनुक्रमे शनिवार-रविवार आहे. यामुळे अनंत चतुर्दशीच्या पूर्वी सलग तीन दिवस सुट्टी असल्याने नागरिक मोठ्या संख्येने सार्वजनिक मंडळांना भेट देण्यासाठी घराबाहेर पडतील. या दिवसांमध्ये लोकलगाड्यांमधील संभाव्य गर्दी लक्षात घेत पश्चिम रेल्वेने १४-१५ सप्टेंबर रोजी १० तासांचा ब्लॉक रद्द करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.