
Tej Police Times
पोशिर येथील चिकन पाडा या गावात राहणारे मदन जैतु पाटील आणि त्याची पत्नी व मुलगा असे एकाच कुटुंबातील तिघांची काल हत्या करण्यात आली आहे. दरम्यान ही हत्या नसून आत्महत्या वाटावी म्हणून आरोपीकडून मृतांचे मृतदेह पाण्यात टाकून बनाव रचण्यात आला होता.
गणेशोत्सवाची धामधूम सर्वत्र सुरू होती. याच गणेशोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 8 सप्टेंबर रोजी कर्जत तालुक्यातील पोशिर या ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या चिकन पाडा या गावात तिहेरी हत्याकांडाची घटना समोर आली. येथील ग्रामस्थांना दशक्रियेच्या विधीसाठी जात असताना एका ओढ्यात गावातील आठ वर्षीय कुमार विवेक मदन पाटील या तरुणाचा मृतदेह सापडला आणि एकाच कुटुंबातील तीन जणांच्या हत्याची माहिती समोर आली. घटनेची माहिती मिळताच नेरळ ,कर्जत आणि पेण येथील पोलिस अधिकारी यासह जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे हजर झाले होते.
आई-वडील आणि मुलगा असे पाटील कुटूंब संपले होते. आरोपीने धारदार शस्त्राचा वापर करून तिघांनाही संपवून मृतदेह पाण्यात टाकले होते. मयत अनिशा मदन पाटील या सात महिन्याच्या गरोदर होत्या. त्या आशा सेविका म्हणून काम करत होत्या.
सदर घटनेत पोलिसांनी तपसाअंती मयत मदन पाटील यांचा भाऊ हनुमंत जैतु पाटील याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. हनुमंत आणि त्याची पत्नी हे गणपती उत्सवाला बाहेर नातेवाईकांकडे गेले होते असे सांगण्यात आले. मात्र, हनुमंतच्या माहितीत पोलिसांना सतत तफावत जाणवत होते,तर पोलिसांनी केलेल्या चौकशीत काही पुरावे हाती लागले आहे. सदर घटनेच्या ठिकाणी पोलिसांनी श्वानपथक, फॉरेन्सिक पथक बोलावली होती. दरम्यान पोलिसांना हनुमंत हा ज्या नातेवाईकांकडे गेला होता तिथे चौकशी केली असता तिथे ही पोलिसांना हनुमंत च्या विरोधात माहिती समोर आली आहे. हनुमंत हा नातेवाईकांकडे काही तासांसाठीच होता. एकूणच पोलिसांचा संशय हा हनुमंतच्या विरोधात गेल्याचे चित्र समोर आले आहे.
आज 9 सप्टेंबर रोजी पोलिसांना काही पुरावे हाती लागल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे. ज्या घरात तिघांचा खुन करण्यात आला तिथे पोलिसांना कुठल्याही प्रकारचा रक्तस्त्राव आढळून आला नव्हता. तिघांची हत्या एखाद्या धारदार शस्त्राने होत आहे तर रक्त वाहने गरजेचे होते. परंतु काही थेंब पोलिसांना घराच्या भीतीवर दिसून आले. आता याच घटनेतील काही पुरावे पोलिसांना बुडालेल्या ओढ्यात कापडी कपडे स्वरूपात हाती लागली आहेत. त्यामुळे हे सारे काही हनुमंत करू शकतो असा संशय पोलिसांना आहे.
मयत मदन आणि भाऊ हनुमंत यांचे राहत असलेल्या घरावरून वाद होत होते. गेली चार महिने हा वाद वाढला होता. राहते घर मदनच्या नावे होते त्यातील अर्धे घर पट्टी आपल्या नावावर करावी म्हणून हनुमंत भावाकडे मागणी करीत होता. घरपट्टी नावे नसल्याने हनुमंतच्या कुटुंबाला कुठल्याच सोयी सुविधा,शासनाच्या योजनेचा लाभ मिळत नव्हता. रेशन कार्ड देखील नव्हते आणि त्यामुळेच हा वाद होऊन हनुमंतने हे हत्याकांड घडवून आणला असावा म्हणून चर्चा सुरू आहे. सदर घटनेचा तपास नेरळ पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग हे संयुक्तपणे तपास करीत आहेत.
पोलिसांच्या हाती आणखी एक महत्वाची गोष्टसमोर आली आहे. हनुमंत ह्याला गुन्ह्यावरील चित्रपट बघण्याची सवय आहे. अजय देवगणचा आलेला चित्रपट दृश्यम हा चित्रपट हनुमंत गेली काही महिने सतत पाहत होता.आणि त्याच चित्रपटाचा आधार घेत त्याने हा खेळ रचला आहे का? याबाबत तपास करण्यात येत आहे. सुरुवातीला आपल्या पत्नीला गणपतीसाठी बाहेर पाठवणे नंतर त्याचा बणाव रचणे हा सर्व खेळ आता पोलिसांच्या समोर आल्याचे समजते आहे. परंतु आरोपीने वापरलेले मुख्य धारदार शस्त्र पोलिसांच्या हाती लागत नसल्याने पोलिसांसमोर एक आव्हान उभे राहिले आहे. काही पुरावे पोलिसांच्या हाती लागले असून लवकरच या खुनाचा तपास समोर लागण्याची शक्यता आहे. एकूणच घटनेतील आरोपी म्हणून पोलिसांची संशयाची सुई ही हनुमंत याच्याकडे अधिक दिसत असून खुनाचा उलगडा हा लवकरच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लेखकाबद्दलअजित भाबडअजित भाबड, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. अजित यांनी आबासाहेब गरवारे कॉलेजमधून पत्रकारितेची मास्टर्स पदवी मिळवली आहे. त्यांना राजकीय, सामाजिक, अंतरराष्ट्रीय तसेच कृषी क्षेत्रातील विश्लेषणात्मक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.