Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Which place is famous for pitru shraddha : भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेपासून पितृपक्षाला सुरुवात होते. पितृपक्षाचा हा पंधरवडा यंदा १८ सप्टेंबरपासून सुरु झाला असून २ ऑक्टोबरला संपणार आहे. पिंडदान करण्यासाठी भारतातील ही ५ ठिकाणी पिंडदानासाठी पवित्र मानण्यात आली आहे. जाणून घेऊया त्याबद्दल
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेपासून पितृपक्षाला सुरुवात होते. पितृपक्षाचा हा पंधरवडा यंदा १८ सप्टेंबरपासून सुरु झाला असून २ ऑक्टोबरला संपणार आहे.
या काळात पितरांच्या आत्मशांतीसाठी पिंडदान आणि श्राद्ध विधी केले जाते. पितृपक्षात पितरांच्या शांती आणि तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात. पिंडदान करण्यासाठी भारतातील ही ५ ठिकाणी पिंडदानासाठी पवित्र मानण्यात आली आहे. जाणून घेऊया त्याबद्दल
हरिद्वार
हरिद्वार हे भारतातील सर्वात पवित्र तीर्थस्थानापैंकी एक मानण्यात आले आहे. गंगेच्या काठावर वसलेले हे सुंदर उत्तराखंडमध्ये आहे. हरिद्वाराच्या नारायणी शिलेवर तर्पण केल्याने पूर्वजांना मोक्ष प्राप्त होतो, असे पुराणात वर्णन करण्यात आले आहे. पितृपक्षाच्या काळात या ठिकाणी पिंडदानाचा सोहळा आयोजिला जातो.
मथुरा
मथुरा शहराला भारतात आणि त्यापलिकडे पवित्र स्थान म्हणून ओळखले जाते. पिंडदानासाठी हे स्थान देखील महत्त्वाचे मानण्यात आले आहे. उत्तरप्रदेशमध्ये असलेले मथुरा हे ठिकाण यमुना नदीच्या काठावर असलेल्या बोधिनी तीर्थ , विश्रामतीर्थ आणि वायु तीर्थ असे विधी केले जातात. मध आणि दुधासह तांदूळ मिसळून गव्हाच्या पिठाचे सात पिंड तयार केले जातात. पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी तर्पण केले जाते.
उज्जैन
मध्यप्रदेशातील उज्जैन हे मंदिराचे शहर म्हणून तर ओळखले जाते पण पिंडदानासाठी देखील महत्त्वाचे आहे. या ठिकाणी शिप्रा नदीच्या काठावर पिंडदानाचे आयोजन केले जाते.
प्रयागराज
गंगा-यमुना-सरस्वती नद्यांच्या संगमावर पूर्वी अलाहाबाद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रयागराजमध्ये पितृसंस्कार केले जाते. या नदीत स्नान केल्याने सर्व पाप धुतले जाते असे म्हटले जाते. या ठिकाणी लोक पिंडदान आणि तर्पण विधी करुन पितरांचे स्मरण करतात.
वाराणसी
वाराणसीला हिंदू धर्मात मोक्ष नगरी म्हटले जाते. या ठिकाणी विधीपूर्वक पिंडदान केल्याने पितरांना मोक्ष प्राप्ती होते. तसेच पितरांचे स्मरण करुन मनोभावे पूजा करायला हवी. पिंडदान करणारी व्यक्ती पिंडदान झाल्यानंतर बाबा विश्वनाथांचे दर्शन आवर्जून घेते.
गया
बिहारमधील बोधगया हे ठिकाण पिंडदानासाठी प्रसिद्ध आहे. रामायण आणि महाभारत यामध्ये याचा उल्लेख केला गेला आहे. बिहारमधील प्रत्येकजण पिंडदानासाठी बोधगयाला जातो. या ठिकाणी २० हून अधिक ठिकाणी पिंडदान केले जाते.