
Tej Police Times
”काँग्रेसचा हात, मतदारांचा घात”, कॉंग्रेस नेते, @VijayWadettiwar मतदारांना हरामखोर म्हणत आहे, 20 तारखेनंतर तुला पाहून घेइन, तुमचे नाव लिहून ठेवले आहेत. अशी धमकीच त्यांनी मतदारांना दिली आहे. लोकशाहीत मतदार हा राजा असतो मात्र लोकशाही, संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा काँग्रेसला सुरुवातीपासूनच तिटकारा आहे. ज्या काँग्रेसने संविधानाची पायमल्ली करत देशावर आणीबाणी लादली असंख्य सामान्य लोकांना तुरूंगात डांबून ठेवले ती काँग्रेस पुन्हा मतदारांना धमकवण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राची जनता मतदानातून काँग्रेसची ही मस्ती नक्कीच उतरवणार…
महान संत शरदचंद्रजी पवार, मराठवाड्यात राज ठाकरेंचा एल्गार, सत्ता नसताना नोकऱ्या लावल्या, एकदा…
एका युजरने लिहिलं आहे की, ”हे आहेत विरोधी पक्षनेते शोभते का यांना अशी भाषा उमेदवार धमकी देत आहे याची दखल निवडणूक आयोगाने घ्ययला पाहिजे. पराभवाच्या भीतीतून त्यांचे वक्तव्य” असं एका युजरने लिहिलं आहे. तर, ”काय ही भाषा जनता नकी घरी बसवेल याला”, असा थेट इशाराच एका युजरने दिला आहे.
कधी चंद्रपूरच्या शुद्ध राजकारणाचे दाखले राज्यात दिले जायचे. आता इथलं राजकारण पूर्णपणे नासलं असल्याचे बोललं जातं आहे. एक खासदार जातीवर बोलतोयं, मंत्री महिलांचा अपमान करतोय, यवतमाळ जिल्हातील वणी येथील भाजपच्या कार्यक्रमात ओबीसी बांधवावर खालच्या पातळीची टीका करण्यात आली. त्याची धग चंद्रपूरपर्यंत येऊन पोहचली आहे. या गढूळ झालेल्या राजकारणाला जबाबदार कोण? याची चर्चा आता रंगली आहे. ज्यांना केवळ जातीय समीकरणच दिसतात त्यांनी येथील राजकारणाला खालचा पातळीवर नेवून ठेवल्याची चर्चा रंगली आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.