तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

घरात बसून कारभाराची सवय सुटली नाही, ठाकरेंच्या वचननाम्यानंतर विरोधकांचा हल्लाबोल

0 34

Chandrakant Bawankule on Uddhav Thackeray Vachannama: शिवसेना (उबाठा) उद्धव ठाकरे यांनी आपला वचननामा जाहीर केला आहे. त्यांच्या या वचननाम्यावर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे.

हायलाइट्स:

  • घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही
  • नेता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो
  • उद्धव ठाकरेंच्या वचननाम्यानंतर विरोधकांचा हल्लाबोल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
उद्धव ठाकरे वचननामा चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. प्रत्येक पक्षांच्या नेत्यांच्या प्रचारसभा, रॅली आता सुरु झाल्या आहेत. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर ५ आश्वासने देण्यात आली आहेत. यातील पहिले आश्वासन महिलांसाठी महालक्ष्मी योजनेची घोषणा काँग्रेसने नेते आणि लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी केली. ते मुंबईतील महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत बोलते होते. मविआकडून विधानसभा निवडणुकीसाठी पंचसूत्री जाहीर करण्यात आली. ज्यात ५ मोठ्या आश्वासनांचा समावेश आहे. यातील पहिले आश्वासन राहुल गांधी यांनी जाहीर केले. याचदरम्यान, शिवसेना (उबाठा) उद्धव ठाकरे यांनी आपला वचननामा जाहीर केला आहे. त्यांच्या या वचननाम्यावर भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी हल्लाबोल केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

”अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’त बसून उबाठा गटाचा वचननामा प्रकाशित केला. उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही. बाळासाहेबांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचं हित. तर उद्धव ठाकरेंच्या समोर फक्त कुटुंब. उद्धवजी नेता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो”, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीटवर (एक्स) उद्धव ठाकरेंना लगावला.
Shiv Sena UBT Manifesto: कुटुंबप्रमुखांचा वचननामा, धारावी ते कोळीवाडा, मुलांनाही मोफत शिक्षण, ठाकरेंच्या जाहीरनाम्यात काय काय?

”हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आतापर्यंत प्रत्येक वचननामा शिवसेना भवनात प्रकाशित केला. कारण त्यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचं हित होतं. पण सच्चा शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त कुटुंबचं आहे. उद्धवजी नेता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो” असं म्हणत बावनकुळेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरेंच्या वचननाम्यात काय काय?

१. धारावी पुनर्विकासाआडून बकालपणाचा सरकारचा डाव हाणून पाडणार.

२. मुंबई आणि महाराष्ट्रराचं नवे गृहनिर्माण धोरण ठरवणार.

३. कोळीवाड्यांचा क्लस्टर जीआर रद्द करणार.

४. राज्यातील बेरोजगारी हटवणार.

६. राज्यातील भूमिपूत्रांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देणार.

७. मुलींप्रमाणे मुलांनांही मोफत शिक्षण देणार.

८.जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.