
Tej Police Times
१. भाजपबरोबर सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद सर्वांना झाला. कारण अर्थातच ईडीपासून सुटका.
२. माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता.
३. मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या
४. उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते
५. दोन-अडीच वर्षे तुरुंगात राहूनही ईडीची पुन्हा नोटीस आली. वयाच्या पंचाहत्तरीत कितीवेळा चौकशांना सामोरे जायचं.
६. तुरुंगात असताना भाजपात आलात तरच सुटका होईल, असं अनिल देशमुखही म्हणतात.
७. अजूनही तुरुंगातील दिवस आठवले की माझी झोप उडते
८. आता या वयातही ईडी माझा पिच्छा सोडायला तयार नाही.
९. पंतप्रधान मोदी वा भाजपबरोबर हातमिळवणी केल्याशिवाय सुटका नाही ही साऱ्यांचीच भावा होती.
१०. शरद पवारांना हे सारे समजत होते. पण ते भाजपबरोबर जाण्यास अनुकूल नव्हते.
११. भाजपबरोबर गेल्याने ईडीच्या जाचापासून साऱ्यांची सुटका झाली.
१२. कदाचित सुनेत्रा पवारांना अटक होऊ शकते, हे कळले तेव्हा अजितदादांनाही घाम फुटला होता.
अशा पद्धतीचे अनेक विधानं या पुस्तकात करण्यात आलेले आहेत. राष्ट्रवादी का फुटली? शरद पवारांचे असलेले निकटवर्तीय सहकारी एकत्र का आले? याची सर्व कारणं यात दिलेली आपल्याला पाहायला मिळेल.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.