
Tej Police Times
बारामतीतील एका सभेत पवार साहेब म्हणाले की, पुढील दीड वर्षात मी थांबणार आहे. व इतरांनी सर्व बघायचं. मग मला सांगा दीड वर्षानंतर साहेबांनी निवृत्ती घेतल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार. मी माझी फुशारकी सांगत नाही. पण दुसरा नवखा बघू शकतो का? त्याला याच्यातलं काही माहिती आहे का? तो शिकेल नाही असं नाही. आम्हीही आईच्या पोटातून शिकून आलेलो नाही, काम करावं लागतं. काही वर्षे लोकांचे प्रश्न समजून घ्यावे लागतात, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. वडगाव निंबाळकर या ठिकाणी पवारांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
मी आता सत्तेत नाही, परंतु राज्यसभेत आहे. अजून माझी दीड वर्षे शिल्लक आहेत. यानंतर राज्यसभेवर जायचे की नाही याचा विचार मला करावा लागेल. पण मी आता कोणतीही निवडणूक लढणार नाही. आतापर्यंत 14 निवडणुका मी लढवल्या. तुम्ही असे लोक आहात की, एकदाही मला घरी पाठवलं नाही. प्रत्येक वेळी निवडूनच देत आलात.परंतु आता मला कोणतीही निवडणूक नको. सत्ता नको, मात्र समाजकारण करत राहणार आणि लोकांचे काम मी करत राहणार आहे. महाराष्ट्रात नव्या नेतृत्वाची फळी उभा करण्याचा संकल्प आम्ही लोकांनी केले आहे. त्याला तुम्हा लोकांची साथ पाहिजे, असं शरद पवार म्हणाले होते.
मी साहेबांच्याच विचाराने पुढे चाललो आहे. त्यावेळी सर्व आमदारांचे एकच म्हणणे होते की, पुढे साहेब सत्ता असल्याशिवाय कामे होत नाहीत. आज वडगाव निंबाळकर सारख्या गावात 57 कोटींचा निधी आला आहे.मी जर सरकारमध्ये नसतो तर हा निधी आला असता का.? पिण्याच्या पाण्याची योजना झाली असती का? रस्त्याची कामे झाली असती का? असं म्हणत अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याबाबत भाष्य केलं.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.