
Tej Police Times
पत्नीच्या किंवा सासरच्या मंडळींच्या हस्तक्षेपाला कंटाळून पुरुषांनी टोकाची पावले उचलल्याच्या घटना दररोज घडत आहेत. करोना प्रादुर्भावाच्या काळात पुरुषांच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली. त्यामुळे घटस्फोटाची प्रकरणेही वाढली. पुरुषांनी अत्याचाराविरोधात खटला दाखल केल्यावर न्यायालयाच्या बाहेरही प्रकरणे सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. विवाहबाह्य संबंध, आर्थिक चणचण, नोकरीच्या ठिकाणी होणारा मानसिक छळ, पत्नीकडून होणारा कुटुंबाचा अपप्रचार, सोशल मीडियामुळे वाढणारे गैरसमज, अशा विविध कारणांमुळे पुरुषांनाही कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जावे लागत आहे. राज्यात दररोज सुमारे शंभरहून अधिक पुरुषांकडून पुरुष हक्क संरक्षण समितीकडे धाव घेतली जात आहे. राज्यात जिल्हानिहाय समितीचे कार्यालये कार्यरत आहे.
कायद्यात बदल करा…
भारतीय दंड संहिता ४९८अ नुसार स्त्रीचा मानसिक शारीरिक छळ केल्यास सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा आहे. तसेच कलम १२५अ फौजदारी कायद्यानुसार स्त्री पोटगीची मागणी करू शकते. मात्र, महिलांकडून होणाऱ्या छळवणुकीविरोधात ४९८ब असे कलम असावे, अशी मागणी पुरुष हक्क समितीमार्फत केली जात आहे. याचबरोबर कलम ३७६नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला जातो; परंतु, बरेचदा महिला या कलमाचा दुरूपयोग करतानाही दिसतात. संगनमताने काही काळ राहतात आणि आर्थिक पाठबळ कमी झाले की बलात्काराचा गुन्हा दाखल करतात. अशावेळी पीडित पुरुषाला समाजात वावरणेही कठीण होते. त्यामुळे या कलमातही पुरुषांच्या अन्यायाविरोधाच्या बाबींचाही उल्लेख करावा, अशीही मागणी केली जात आहे.
भाजपची मोठी कारवाई; नाशिकच्या सात माजी नगरसेवकांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी
धुळ्यात डिसेंबरमध्ये अधिवेशन
राज्यातील पुरुषांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी पुरुष हक्क संरक्षण समितीतर्फे धुळे येथे १ डिसेंबर रोजी २७वे राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन केले आहे. या अधिवेशनात पुरुषांना त्यांच्या समस्या मांडता येणार असून त्यावर मंथन होणार आहे.
कैलास गेहलोत अखेर भाजपमध्ये; ‘आप’ला सोडचिठ्ठी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीच निर्णय
…येथे करा संपर्क
पीडित पुरुषांना पुरुष हक्क संरक्षण समितीच्या कार्यालयात किंवा फोनद्वारेही संपर्क करता येणार आहे. कार्यालय सांगलीमध्ये असल्याने राज्यातील इतर जिल्ह्यातील पुरुषांना ९८२३१८७८८२ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन पुरुष हक्क संरक्षण समितीने केले आहे.
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची दाद मागता येते, त्याचप्रमाणे पुरुषांनाही दाद मागता यावी यासाठी समितीची स्थापना केली आहे. गेल्या काही वर्षांत पुरुषांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे. मोबाइल आणि टीव्ही मालिकांच्या माध्यमातून महिला वर्गाला वागणुकीचे चुकीचे धडे थेट मिळतात. त्यामुळे कुटुंब व्यवस्था विस्कटत आहे. कोणाचाच वचक राहिलेला नाही.- अॅड. बाळासाहेब पाटील, अध्यक्ष, पुरुष हक्क संरक्षण समिती
लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.