
Tej Police Times
काही वेळाने समीर भुजबळांनी अडवून ठेवलेले मतदार संतापल्याचे पाहायला मिळाले. “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला मतदानापासून वंचित ठेवू नका, पोलिसांनो…आमचे आधारकार्ड तपासा, आम्ही बिहारी नाही तर मतदार संघातलेच आहोत, जेवणासाठी केवळ थांबलेलो होतो, संयम बाळगला, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका”, असे म्हणत मतदारांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार याचा कौल देणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभर मतदान होत आहे. जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया राबविण्यात येत असून, १९६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. यंदा किमान ७५ टक्के मतदान व्हावे, असे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे. निवडणूक यंत्रणा मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी सज्ज झाली असून, भयमुक्त वातावरणात मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.