
Tej Police Times
काँग्रेसचा पराभव व्हावा ही तर मित्रपक्षांचीच इच्छा
भाजपच्या मित्रपक्षांप्रमाणेच काँग्रेसच्याही मित्रपक्षांची इच्छा आहे. झारखंडमध्ये काँग्रेस सत्तेतला ज्युनियर पार्टनर आहे. तर मविआमध्ये काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष आहे. लोकसभेला काँग्रेसनं राज्यात सर्वाधिक १३ जागा मिळवल्या. देशात काँग्रेसनं ९९ जागा जिंकल्या. काँग्रेसची वाढती ताकद इंडिया ब्लॉकमधील अनेक पक्षांसाठी अडचणीची आहे. काँग्रेस मजबूत झाल्याचा फटका त्यांच्या मित्रपक्षांना बसू शकतो. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसला फटका बसावा अशी इंडिया ब्लॉकमधील अनेक पक्षांची इच्छा आहे.
बंडखोर, अपक्षांवर नजर; फडणवीसांचे ६ शिलेदार सक्रिय; सूरत प्लान यशस्वी केलेले तिघे मोहिमेवर
लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीला चांगलं यश मिळालं. त्यामुळे विरोधी पक्षांचं नेतृत्त्व काँग्रेस, पर्यायानं राहुल गांधी करु शकतात, अशी चर्चा सुरु झाली. हरियाणात सगळे एक्झिट पोल काँग्रेसच्या बाजूनं होते. त्यामुळे काँग्रेसचा वरचष्मा, वर्चस्व वाढू लागलं. पण हरियाणतील पराभवानंतर काँग्रेसला जोरदार धक्का बसला. मविआतील जागावाटपातही काँग्रेस पक्ष बॅकफूटला आला. आता राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस आणखी मागे यावा, अशी प्रादेशिक पक्षांची इच्छा आहे. काँग्रेसला महाराष्ट्रात फटका बसल्यास या पक्षांची इच्छा पूर्ण होईल.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.