
Tej Police Times
सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, साम-दाम-दंड-भेद कपटकारस्थान मॅनेजमेंट सगळं करून एकदाची महाविनाश युती जिंकली. आता चर्चा सुरू झाली ती मुख्यमंत्री पदाची… तसं पाहिलं तर भाजपाच्या सोबत अपक्ष आले तरीसुद्धा भाजप स्वतःच्या जीवावर सरकार बनवू शकते. अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांची भाजपला गरज पडणार नाही.
पुढे अंधारे यांनी पोस्टमध्ये म्हटले, पण जर भाजपचं सरकार येणारच असेल तर मग महाराष्ट्रातल्या ज्या सगळ्या ओबीसी भावंडांनी भाजपाला मतदान केलं असा भाजपचा दावा आहे त्या ओबीसी भावंडांना सत्तेचा वाटा मिळायला हवा आणि मुख्यमंत्री करायचाच असेल तर मग तो ओबीसीचा का नको? उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये पाच वेळा महिला मुख्यमंत्री होऊ शकते. निव्वळ प्रचाराच्या वेळेला फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवरायांची आठवण करणारे मोदी शाह यांनी महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री द्यायला काय हरकत आहे?
अंधारे यांनी पुढे म्हटले, ओबीसी महिला मुख्यमंत्री असे एका दगडात दोन पक्षी होऊ शकतात. भाजपाने पंकजा मुंडे यांचे नाव पुढे करायला हवे. म्हणजे एकाच वेळेला महाराष्ट्रातल्या ओबीसींना आणि महिलांना न्याय मिळेल. शिवाय महिला मुख्यमंत्रीपदाचा इतिहास करून दाखवला याची टिमकी वाजवायला ही भाजपा मोकळी. पण भाजपा असं करणार नाही, तिथल्या ओबीसींना नेतृत्व देण्याची जी दानत होती ती फक्त सरसेनापती शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्येच …!! ज्यांनी गोपीनाथ मुंडे किंवा छगन भुजबळ यांच्या रूपाने ओबीसींना संधी दिली…
लोक आता सुषमा अंधारे यांच्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. एकप्रकारे सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमधून थेट पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करा असेच म्हटले आहे. पंकजा मुंडे यांनी काही वर्षांपूर्वी थेट म्हटले होते की, मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहे. त्यामध्येच आता सुषमा अंधारे यांनी शेअर केलेली ही पोस्ट चर्चेचा विषय नक्कीच ठरल्याचे बघायला मिळतंय.
लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.