
Tej Police Times
नवी मुंबईच्या विमानतळावरून एप्रिल २०२५ रोजी विमानोड्डाण होण्याची शक्यता आहे. पनवेलबाजूकडून विमानतळाला जोडणारा रस्ता कळंबोली सर्कलपासून अवघ्या काही मिनिटांवर आहे. जेएनपीटी, स्टीलमार्केट, शिळफाटा, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे, पनवेलमधून जाणारा जुना मुंबई-पुणे महामार्ग, जेएनपीटीला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग अशा वेगवेगळ्या रस्त्यांना जोडणारा कळंबोली सर्कलवर सध्या ताण आहे. मध्यरात्र ते सकाळपर्यंतची वेळ वगळल्यास वाहतूक पोलिसांशिवाय सर्कलची वर्दळ सुरळीत राहात नाही.
मुंबईहून गोवा, अलिबाग, पुणे; तर शिळफाट्याहून पुणे, जेएनपीटी, गोवा अलिबाग या भागांत जाणाऱ्या वाहतुकीमुळे राज्यातील महत्त्वाच्या मागांना जोडणारे सर्कल आहे. परगावी जाणाऱ्या वाहनांसोबत स्थानिक नोकरी, व्यवसाय, शाळा, महाविद्यालांतील तरुणांना या कोंडीत अडकावे लागते. येत्या तीन वर्षांत ही कोंडी इंटरचेंजच्या माध्यमातून सोडवण्यात येणार आहे. सिग्नलविरहित रस्त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या मुंबई-पुणे महामार्गाच्या बरोबरीने आणि दोन टप्प्यांवर उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रकल्पाची वर्कऑर्डर टीआयपीएल कंपनीला देण्यात आल्याची माहिती कंपनीचे संचालक धरणीकुमार यांनी दिली.
लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.