
Tej Police Times
माझी तब्येत बरी आहे, मी गावाला यायचं नाही का? CM पदाबाबत शिंदे म्हणाले- मुख्यमंत्री व्हावं अशी…
पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, आता तब्येत माझी बरी आहे. निवडणुकीच्या काळात मी थकलो होतो. त्यामुळे आराम करण्यासाठी गावी आलो होतो. मला इथे आल्यावर आनंद मिळतो. सत्ता स्थापन होत असताना मी गावाला यायचं नाही का? असं काही नियम आहे का? मी नेहमी गावी येतो. ही निवडणूक महायुती प्रचंड मताने जिंकली असून जनतेच्या मनातील सरकार आता स्थापन होईल. गेल्या अडीच वर्षांची आमच्या विकास कामाची ही पोच पावती आहे. जे प्रकल्प मागील अडीच वर्षांपूर्वी थांबवले होते ते वेगाने सुरू केले आहेत. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये विविध योजना झाल्या त्यापेक्षा सर्वात जास्त योजना आम्ही राबवल्या आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात या झालेल्या योजना सुवर्ण अक्षरात लिहिल्या जातील, असं ते म्हणाले.
Maharashtra CM : महाराष्ट्रात एकनाथ शिंदेच ‘Boss’! दिल्ली हाय कमांड पुन्हा एकदा वापरणार धक्का तंत्र?
मी गावी आल्यानंतर मला वेगळा आनंद मिळतो. मला सर्वसामान्यांच्या गरिबीची जाणीव आहे. मी मुख्यमंत्री व्हावं अशी जनतेची इच्छा आहे, पण जनतेच्या मनामध्ये राहून मी काम केलं. हे जनतेचे प्रेम आहे. कॉमन मॅन समजून मी काम केलं आहे. कोणाचाही संभ्रम नको म्हणून मागील आठवड्यामध्ये मी पत्रकार परिषद घेतली होती. मोदी आणि अमित शाह जे निर्णय घेतील तो मला आणि शिवसेनेला मान्य असेल याबाबत मी स्पष्ट केलं, असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.
लोकांना जी आश्वासन दिली आहेत ती पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मला काय मिळालं, दुसऱ्याला काय मिळालं हे महत्त्वाचं नसून जनतेला काय मिळणार आहे हे महत्त्वाचं आहे. उपमुख्यमंत्री पदाबाबत श्रीकांत शिंदे यांच्याबाबत आपण पत्रकारच चर्चा करत असता. पण या सर्व चर्चा आहेत. एक बैठक अमित शाह यांच्यासोबत झाली आहे. दुसरी बैठक आमची तिघांची होईल, त्यामधून योग्य तो निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा होईल, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
शिंदेंनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडल्यानंतर फडणवीसांनीचे मोठे वक्तव्य; लोकांच्या मनातील किंतू परंतू…
लोक काय बोलतात? विरोधक काय बोलतात? त्यांना काही काम राहिलेलं नाही. आमच्यामध्ये कोणताही समन्वयाचा अभाव नाही. विरोधकांना काही काम नाही. अगदी विरोधी पक्षनेता देखील होता येत नाही एवढं संख्याबळ आता त्यांचं कमी आहे, असं म्हणत शिंदेंनी विरोधकांना टोला लगावला. लाडक्या बहिणींचा मोठा सहभाग या विजयामध्ये आहे. या भावांनी, शेतकऱ्यांनी आम्हाला प्रेम दिलं, या सर्वांच्या आशीर्वादामुळे ही निवडणूक आम्ही जिंकलो, असं म्हणत त्यांनी जनतेचे आभार मानले.
माझी तब्येत बरी आहे, मी गावाला यायचं नाही का? CM पदाबाबत शिंदे म्हणाले- मुख्यमंत्री व्हावं अशी…
झारखंडमध्ये ते जिंकले त्यावेळी काही प्रॉब्लेम नव्हता, लोकसभेमध्ये ते जिंकले त्यावेळी काही प्रॉब्लेम नव्हता. जेव्हा तुम्ही हरता तेव्हा ईव्हीएम खराब आहे, जेव्हा जिंकता त्यावेळेस ईव्हीएम चांगला आहे, अशी विरोधकांची भूमिका आहे. फेरमतमोजणी बाबत निवडणूक आयोग निर्णय घेईल, असं म्हणत शिंदेंनी विरोधकांवर ईव्हीएम घोटाळ्यावरुन टीका केली आहे.
लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.