तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

Kumbh Mela 2025 : कुंभमेळा 12 वर्षांनी का आयोजीत केला जातो? कुंभमेळ्याचे महत्त्व, जाणून घ्या

0 28

Kumbh Mela Importance: प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा १३ जानेवारी पासून सुरु झालेला आहे. लाखोंच्या संख्येने साधू, संत आणि श्रद्धाळू दाखल झालेले आहेत. कडाक्याची थंडी, दाट धुकं तरी भक्तगण त्रिवेणी संगमावर शाही स्नान करत आहेत. दर १२ वर्षांनी हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक येथे कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. कुंभमेळा याबद्दल अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. पण कुंभमेळा दर 12 वर्षांनी का आयोजीत केला जातो, याबद्दल अधिक जाणून घेऊया…

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Kumbh Mela Held Every 12 Years:

प्रयागराजमध्ये 12 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 13 जानेवारी 2025 पासून कुंभमेळ्याची सुरुवात झालेली आहे. हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि प्राचीन परंपरांपैकी एक म्हणजे कुंभमेळा ! कुंभमेळा आयोजीत करण्यामागे काही पौराणिक, धार्मिक आणि खगोलीय कारणे आहेत. यासंदर्भात अधिक माहिती घेऊन दर 12 वर्षांनी कुंभमेळा का होतो, ते पाहूया.

कुंभमेळा का आयोजीत केला जातो?

कुंभमेळ्याबद्दल अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात त्यातील एक महत्त्वाची कथा म्हणजे समुद्रमंथन ! देव आणि दैत्यांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन केले होते. त्यावेळी अमृत कलश बाहेर आला पण तो दैत्यांपासून वाचविण्यासाठी देव तो अमृतकलश घेऊन पळू लागले. तेव्हा अमृताचे काही थेंब जमीनीवर पडले. ते अमृत थेंब जिथे पडले ती ठिकाणं आहेत, हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक, म्हणून या ठिकाणी कुंभमेळा आयोजीत केला जातो. अमृताचे थेंब हरिद्वारच्या ब्रह्म कुंडात, उज्जैनमध्ये शिप्र नदीच्या काठावर आणि नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या किनारी पडला होता.

कुंभमेळ्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व

कुंभमेळ्याचा मुख्य उद्देश आहे, भक्तगण किंवा श्रद्धाळूंची आत्मशुद्धीची एक संधी देणे. अशी मान्यता आहे की, कुंभमेळ्यात शाही स्नान केल्यामुळे आत्मशुद्धी होते, पापांचा नाश होवून मोक्ष प्राप्ती होते. कुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान केलं जातं. कुंभमेळा म्हणजे साधू-संत, गुरु, भक्तगण आणि श्रद्धाळू यांच्यातील ज्ञान, भक्ती आणि सेवा यांची देवाणघेवाण करणारे एक महत्त्वाचे केंद्र आहे.

कुंभमेळा दर 12 वर्षांनी का होतो?

कुंभमेळ्याची तारखा खगोलीय घटनांवर आधारित असतात. गुरू ग्रह आणि सूर्याची स्थिती यांचा कुंभमेळ्याशी मोठा संबंध आहे. जेव्हा गुरू ग्रह कुंभ राशीमध्ये प्रवेश करतो आणि सूर्य मकर राशीमध्ये असतो, तेव्हा कुंभमेळा आयोजीत केला जातो. गुरु ग्रहाला त्याच्या कक्षेत 12 वर्षांचा कालावधी लागतो, म्हणून कुंभमेळा दर 12 वर्षांनी एकदा आयोजित केला जातो. ज्योतिष शास्त्रात 12 राशी असतात. या 12 राशी 12 महिने दर्शवितात, ज्या वेळ आणि मानवी जीवनाशी संबंधीत आहेत. कुंभ राशीत गुरू आणि सूर्य आल्यानंतर कुंभमेळा आयोजीत केला जातो. त्याचबरोबर 12 वर्षांचे चक्र मानवी जीवनात एक विशेष ऊर्जा परिवर्तन करतं. हा कालावधी आत्मशुद्धी, श्रद्धा आणि ध्यानासाठी अतिशय उपयुक्त मानला जातो.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.