Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Shattila Ekadashi 2025: षटतिला एकादशीला करा या वस्तूंचे दान ! भगवान विष्णूंसह माता लक्ष्मीची कृपा, सुखसमृद्धीचे योग !

13

Shattila Ekadashi Importance of Donation: षटतिला एकादशीला भगवान विष्णूंची विधीवत पूजा केली जाईल. षटतिला एकादशीच्या दिवशी भक्त सहा प्रकारे तिळांचा वापर करतात. आज ( २५ जानेवारी २०२५) षटतिला एकादशीचे व्रत अनेकांनी केले असले. यादिवशी विशेष वस्तूंचं दान केलं जातं, यामुळे भगवान विष्णू यांच्यासह माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो असे म्हणतात. नक्की कोणत्या वस्तूंचे दान षटतिला एकादशीला करालयला हवे, चला पाहूया.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Shattila Ekadashi che daan : २५ जानेवारी २०२५, शनिवार, षटतिला एकदशीचे व्रत अनेकांनी केले असेल. यादिवशी भगवान विष्णुंसह माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी काही विशेष वस्तूंचं दान केलं जातं. यामुळे जीवनात धन-धान्याची कमतरता राहात नाही आणि तुमच्या वाटेतील अडचणी कमी होतात, असे म्हणतात. या एकादशीला भगवान विष्णु यांच्यासह माता लक्ष्मीच्या कृपेला देखील महत्त्व आहे. विशेषत: जर आपण षटतिला एकादशीला काही गोष्टींचं दान केलं, तर आपलं जीवन सुख-समृद्धीने भरून जातं. धन प्राप्तीचे मार्ग खुले होतात. चला तर, पाहूया कोणत्या गोष्टींचे दान करायला हवे

तिळाचे दान

षटतिला एकादशीला तिळाचं दान केल्याने जीवनात सुख-समृद्धी आणि मानसिक शांतता येते. तिळाचं दान केल्याने नवग्रहांची शांती देखील होते. त्याशिवाय, माता लक्ष्मीची कृपा कायम राहते.

लोकरीचे कपडे

पौष महिना असल्यामुळे थंडीशी संबंधित वस्तूंचं दान देणं महत्त्वाचं आहे. षटतिला एकादशीला उबदार कपड्यांचं दान केल्याने माता लक्ष्मीची कृपा कायम राहते. यामुळे जीवनात धन-धान्याची कमतरता राहत नाही.

गुळाचे दान

गुळाचा संबंध सूर्य आणि मंगळ ग्रहांशी आहे. जर तुमची प्रगती होत नसेल किंवा डोळ्यांशी संबंधित काही समस्या येत असतील तर षटतिला एकादशीला गुळाचं दान करायला हवं. गुळाचं दान केल्याने माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते.

अन्नदान

शरीरात ऊर्जा टिकवण्यासाठी अन्न महत्त्वाचे आहे. म्हणून षटतिला एकादशीला अन्नदान केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते, तसेच तुमच्या जीवनात धन-धान्याची समृद्धी राहते असे म्हणतात.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.