
Tej Police Times
षटतिला एकादशीला तिळाचं दान केल्याने जीवनात सुख-समृद्धी आणि मानसिक शांतता येते. तिळाचं दान केल्याने नवग्रहांची शांती देखील होते. त्याशिवाय, माता लक्ष्मीची कृपा कायम राहते.
पौष महिना असल्यामुळे थंडीशी संबंधित वस्तूंचं दान देणं महत्त्वाचं आहे. षटतिला एकादशीला उबदार कपड्यांचं दान केल्याने माता लक्ष्मीची कृपा कायम राहते. यामुळे जीवनात धन-धान्याची कमतरता राहत नाही.
गुळाचा संबंध सूर्य आणि मंगळ ग्रहांशी आहे. जर तुमची प्रगती होत नसेल किंवा डोळ्यांशी संबंधित काही समस्या येत असतील तर षटतिला एकादशीला गुळाचं दान करायला हवं. गुळाचं दान केल्याने माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते.
शरीरात ऊर्जा टिकवण्यासाठी अन्न महत्त्वाचे आहे. म्हणून षटतिला एकादशीला अन्नदान केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते, तसेच तुमच्या जीवनात धन-धान्याची समृद्धी राहते असे म्हणतात.
लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.… आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.