तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

Nashik : नाशिकच्या निफाडमधील पहिली महिला BSF जवान शहीद, राजस्थानमध्ये झाली होती दुखापत

0 47

नाशिक : निफाड तालुक्यातील २३ वर्षीय पहिली महिला जवान शहीद झाली आहे. निफाड तालुक्यातील सीमा सुरक्षा दलातील पहिली महिला जवान गायत्री विठ्ठल जाधव राजस्थानमधील अलवर येथे दलाचे प्रशिक्षण घेत असताना खड्ड्यात पडून डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेने निफाड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. निफाड तालुक्यातील देवगाव येथील जाधव कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

सीमा सुरक्षा दलातील महिला जवान गायत्री जाधव ही राजस्थानमधील अलवर येथे प्रशिक्षण घेण्यासाठी गेली होती. प्रशिक्षणादरम्यान खड्ड्यात पडून तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने ती जखमी झाली होती. तिच्यावर विविध ठिकाणी उपचार करण्यात आले. मात्र, अखेर तिची मृत्युशी असलेली झुंज अपयशी ठरली. शहीद गायत्री जाधव बिहारच्या अररिया जिल्ह्यातील बथनाहा येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत होती. ती राजस्थानमध्ये प्रशिक्षणासाठी गेलेली होती. यावेळी ही दुर्घटना घडली.

गायत्री जाधव प्रशिक्षणा दरम्यान पडून जखमी झाल्यानंतर तिच्यावर अलवर येथे मेंदूवर शास्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ती पुन्हा प्रशिक्षणासाठी रुजू झाली. मात्र पुन्हा त्रास जाणवू लागल्याने जयपूर येथील एसएमएस हॉस्पिटलमध्ये तिच्या मेंदूवर दुसरी शस्रक्रिया करण्यात आली. दुसरी शस्त्रक्रिया झाल्यानंतरही गायत्री पुन्हा प्रशिक्षणाला रुजू झाली.

प्रशिक्षण कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ३० मार्च २०२२ ला बिहारमधील बथनाहा येथे नेपाळ सीमेवर ती कर्तव्यावर रुजू झाली. कर्तव्यावर असताना तिला पुन्हा त्रास जाणवू लागल्याने ती सुट्टी घेऊन नाशिकला घरी आली. त्यानंतर नाशिक आणि मुंबई येथे तीन महिने उपचार घेतले. बरे न वाटल्याने अधिक उपचारासाठी गायत्रीला दिल्ली येथे घेऊन जाणार होते. पण त्यापूर्वीच मंगळवारी दुपारी तिची तब्येत खूप खालावली आणि तिची दृष्टी गेल्याने लासलगाव ग्रामीण रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. पण दुर्दैवानं तिचा मृत्यू झाला. गायत्रीची प्राणज्योत माजावल्याची बातमी देवगाव पंचक्रोशीत पसरताच गावासह संपूर्ण निफाड तालुक्यावर शोककळा पसरली.

सचिन पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव? पिंपळगाव बसवंत टोल प्रकरण

जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असलेल्या देवगाव येथील गायत्रीने प्रतिकुल परिस्थितीवर मात करत मोठ्या कष्टातून आणि अंगी असलेल्या जिद्दी चिकाटीतून सीमा सुरक्षा दलापर्यंत झेप घेतली होती. गायत्री जाधवच्या घरची परिस्थिती हलाकीची असल्याने तिने रोजंदारीवरही काम केले. यातच तिने देश सेवा करण्याचा निर्णय घेतला होता.

Measles Case : मुंबई, मालेगाव पाठोपाठ नाशिकमध्येही गोवरचे संशयित; आरोग्य यंत्रणा

तालुक्यात असणाऱ्या देवगावातील श्री. डी. आर. भोसले विद्यालयात शिक्षण घेतले. यानंतर लासलगाव नूतन महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. त्यानंतर लासलगाव येथील एका अकॅडमीत ट्रेनिंग घेऊन स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परिक्षेत उत्तीर्ण झाली. आणि त्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षणासाठी २१ मार्च २०२१ ला देवगावची कन्या गायत्री जाधवची निवड झाली होती.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.