
Tej Police Times
हिंदू वयाच्या ४० वर्षांपर्यंत…; बद्रुद्दीन अजमल यांनी विवाहासंदर्भात केले वादग्रस्त विधान
आम्ही राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन केले नसल्याचं भाजप सांगत असला तरी त्यांनी निषेधही केलेला नाही. समर्थन न करणे म्हणजे निषेध नाही. तुम्ही धिक्कार केला नाही की कारवाईची मागणी केली नाही, हा तुमचा नामर्दपणा आहे. राज्यपालांचे समर्थन केलं नाही हा भाजपचा खुलासा आमच्या जखमेवर मीठ चोळणारा असल्याचे संजय राऊत म्हणाले.
कर्नाटकच्या सरकारने वातावरण बिघडवण्यासाठी योजनाबद्ध आराखडा केला आहे. बेळगाव कारवार प्रश्नावरून लक्ष दूर करण्याचा हा प्रयत्न आहे. छत्रपतींच्या अपमानाबद्दल महाराष्ट्रात जो रोष निर्माण झालाय, त्यावरून लक्ष विचलीत करण्याचा देखील हा प्रयत्न आहे. महाराष्ट्र भाजप आणि कर्नाटक भाजपने केंद्राच्या मदतीने हा प्रश्न उकरून काढला आहे, असा आरोप करत राऊत यांनी सीमा प्रश्नाकडे गांभिर्याने बघण्याची गरज असल्याचे म्हंटले आहे. यासंबधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय करत आहेत?, असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
ऐकावं ते नवलच! सूर्याला पडू लागल्या विशाल भेगा, महाकाय खड्डे, पृथ्वीवर येत्या दोन दिवसांत…
राजेशाही असती तर छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांचा कडेलोट केला असता, ही उदयनराजेंची मागणी महाराष्ट्राची भावना आहे. साडेतीनशे वर्षांपासून टकमक टोकाचा वापर झाला नाही आहे. या निमित्ताने तो व्हावा, असे संजय राऊत म्हणाले.
या अगोदर बेळगावमध्ये महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी आंदोलने केली. जर आता दोन मंत्र्यांना जाता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. खरं तर मुख्यमंत्र्यांनी जायला पाहिजे. मंत्र्यांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाता येत नसेल तर फाळणी झालीय का?, हा काय भारत-पाकिस्तान आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. आमचा लढा कर्नाटकच्या जनतेशी नसून मानवतेचा आहे. अनेक दशकांपासून कर्नाटकात मराठी बांधवांवर अत्याचार सुरू असल्याची प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.
हमें जाना है…, जाना हैं तो जाने दो ना; राज्यपालांवर कारवाई केव्हा?, अजित पवारांनी व्यक्त केला अंदाज
Recover your password.
A password will be e-mailed to you.