
Tej Police Times
प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर त्यांना करेक्ट करण्याचा प्रयत्न समोर बसलेल्या व्यक्तींनी केला. महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला, असं त्यांनी म्हटलं. त्यावर आपलं वाक्य करेक्ट न करताच सारवासारव करताना शिवरायांचं बालपण रायगडावर गेले, असं प्रसाद लाड म्हणाले. छत्रपती शिवरायांनी रायगडावरच स्वराज्याची शपथ घेतली आणि तिथूनच त्यांच्या शौर्याची सुरुवात झाली, असंही लाड म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसची सडकून टीका
भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या. शिवाजी महाराज यांच्या नावे निवडणूक लढवतात. परंतु महाराजांचा इतिहासाच यांना माहीत नाही. त्यांच्या चुका उपस्थित पत्रकार सुधारत आहेत. ही खूप लाजिरवाणी बाब आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीने प्रसाद लाड यांच्यावर टीका केली.
वाचाळवीरांना आवरा-मिटकरी
दररोजची सकाळ उगवते ती वाचाळवीर नेत्यांकडून आणि आमदारांकडून… ते ही शिवरायांबद्दलच वादग्रस्त वक्तव्ये करतात… ज्यांना कसलाही इतिहास माहिती नाही, जे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेत, त्यांच्याकडून अशा वादग्रस्त विधानांची मालिकाच सुरु आहे. कोश्यारी, त्रिवेदी, मंगलप्रभात लोढा, आणि आता लाड ठरवून अशी विधाने करतात, अशा वाचाळवीरांना आवरलं पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी यांनी दिली.
Recover your password.
A password will be e-mailed to you.