
Tej Police Times
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका अशी दिसत आहे की, आमचं ते आमचं आणि तुमचा तेही आमच्या बापाचं. परंतु आमचे मुख्यमंत्री काय करतात हा प्रश्न आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलतात, त्याच्याशी महाराष्ट्राला काही देणघेणं पडलेलं नाही. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्या इकडले प्रमुख आहेत. ते बोम्मई यांना कशाप्रकारे उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मुख्यमंत्री या लढ्यात उतरले आहेत की नाहीत? कर्नाटकच्या प्रश्नावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अद्याप तोंड उघडलेले नाही. काल देखील आमचे खासदार हे अमित शहा यांना भेटलेले आहेत. मिंधे सरकारचे खासदार यावरती गप्प बसलेले आहेत. बोम्मई बोलतात की, मी अमित शहांचा ऐकणार नाही. मग अमित शहा कसली मध्यस्थी करणार आहेत, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
महाराष्ट्रातल्या मागील सर्व मुख्यमंत्र्यांनी कठोर भूमिका कर्नाटकच्या प्रश्नावर घेतलेली आहे. परंतु, आताचे मुख्यमंत्री यावर काहीही बोलले नाहीत. हे सरकार तोंडाला कुलूप लावून बसलेले आहे. त्यांचे निशाणी कुलूप पाहिजे, ढाल तलवार नको. त्यांच्या कुलूपाची चावी दिल्लीला आहे. त्यांची बोलण्याची हिंमत नाही. महाराष्ट्राच्या स्वाभिनासाठी पक्ष सोडला असे ते सांगतात, मग आता कुठे आहे त्यांचा स्वाभिमान, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राचे अवहेलना पदोपदी करावी महाराष्ट्राचा अपमान करावा, यासाठी संपूर्णपणे षडयंत्र आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Recover your password.
A password will be e-mailed to you.