
Tej Police Times
कागदावर एवढा मोठा संघ आहे. परंतु मैदानात उतरुन मुंबई महापालिकेची जबाबदारी घ्यायला कोणीच नसल्याची परिस्थिती आहे. आणि जर कोणी आलेच तर उरलेले सगळेजण त्या नेत्याचं ऐकतील अशी स्थती नाही. उलट भाजपमध्ये फडणवीसांनी एखादी गोष्ट सांगितली तर ती टाळून पुढे जाण्याची हिंमत कोणाकडे नाही. परंतु कॉंग्रेसमध्ये ना कसलं नियोजन आहे ना कसला हिशेब…. पक्षाचे प्रभारी एच. के पाटील यांनी पालिका निवडणुकीसाठी कोणत्याही बैठका घेतलेल्या नाहीत.
गुजरातच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील नेत्यांनी हजेरीही लावली होती. आता भाजपला गुजरातेत दणक्यात यश मिळालंय. आता मुंबई महापालिकेसाठी गुजरातीबहुल भागात गुजराती नेते येतील. उत्तर भारतीय प्राबल्य असणाऱ्या भागात तिकडचे नेते हजेरी लावतील. प्रत्येकाला काय काम द्यायचे हे भाजपने ठरवलंय. असं असताना काँग्रेस, राष्ट्रवादीचं नियोजन काय आहे? या मोठा चर्चेचा विषय आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेची गेली २५ वर्षांपासून सत्ता आहे. त्यात ठाकरेंकडे शाखांचे संघटन असल्याने निवडणुकीतही त्यांना त्यांचा चांगला लाभ मिळेल.
राहुल गांधींनी महाराष्ट्रातून भारत जोडो यात्रा काढली… मात्र मुंबईत यात्रेचा फार काही बोलबोला पाहायला मिळाला नाही. होर्डिंग्जचा खर्च करायचा कोणी? यावरून अख्खी यात्रा संपली तरी मुंबईत दहा-वीसच्या वर बॅनर लागले नाहीत. तर राष्ट्रवादीचा मुंबईत म्हणावा तेवढा बेस नाही. शिवसेना-काँग्रेस आघाडी व्हावी, अशी उद्धव ठाकरेंची इच्छा आहे. यावर अजूनतरी काँग्रेसने फारसे मनावर घेतलेले दिसत नाही. अशी सगळी परिस्थिती असताना मुंबईत काँग्रेसचे काय होणार? याची चर्चा सध्या पक्षातल्याच पदाधिकाऱ्यांमध्ये रंगते आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Prev Post
Recover your password.
A password will be e-mailed to you.