
Tej Police Times
महाविकास आघाडीमार्फत शनिवारी मुंबईतील मोर्चा काढण्यात येणार आहे. तो यशस्वी करण्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे आणि रायगडसह राज्याच्या विविध ठिकाणांहून मोर्चेकरी आणण्याचे नियोजन अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यात झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत गुरुवारी करण्यात आलं आहे.
हा मोर्चा महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची अखंडता याविषयी असल्यामुळे प्रत्येक नागरिकाच्या भावनेशी निगडित आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी या प्रश्नावरही मोर्चाद्वारे सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेचा धिक्कार करण्यात येणार असल्याचा संदेश जनतेपर्यंत नेण्याचे यावेळी ठरले. मोर्चास बसगाड्या, खासगी वाहनांशिवाय रेल्वे आणि लोकलने नागरिकांना आणण्याचे नियोजन असल्याचे आघाडीच्या एका नेत्याने सांगितलं आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.