Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ग्रामपंचायत निवडणुकीत उद्योगमंत्री उदय सामंत यांना धक्का? ठाकरे गटाकडून मोठा दावा

15

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत निकालानंतर मतदारसंघात ८० टक्के ग्रामपंचायतींवर ठाकरे सेना विजयी झाल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. यावर अद्याप उद्योगमंत्री आणि शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाच्या शिवसेनेचं वर्चस्व होतं आणि राहिल्याचा दावा ठाकरे गटाच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख बंड्या साळवी यांनी केला आहे. तर २९ पैकी २३ ग्रामपंचायती या भाजप आणि शिंदे गट म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडे आल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने ८० टक्के ग्रामपंचायती जिंकल्याचा केलेला दावा हा निव्वळ दिशाभूल करणारा असल्याची प्रतिक्रिया जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी दिली आहे.

तालुक्यातील महत्त्वाच्या ग्रामपंचायती ठाकरे गटाकडे

भाजपच्या ५ ग्रामपंचायतींपैकी ३ या भाजपने राखल्या आहेत. भाजपकडील गणेशगुळे ग्रामपंचायत शिंदे गटाकडे गेली आहे. कासारवेळी, भगवतीनगर या ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे गेल्या आहेत. तर धामणसे, निवळी गावडे आंबेरे पिरदवणे भाजपकडे आल्या आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने सगळ्या ग्रामपंचायतींमध्ये आपले सदस्य पाठवले. काही ठिकाणी तर भाजपचा एकही सदस्य नव्हता. पण या निवडणुकीत भाजपचे सदस्य ग्रामपंचायतींमध्ये निवडून आले आहेत. आता भाजपचे सदस्य वाढले. जिथे नव्हते तिथे भाजपने गावागावातून खाती उघडली आहेत.

मालगुंड ग्रामपंचायतमध्ये ६ सदस्य ठाकरे गटाची शिवसेना तर ५ शिंदे गटाचे सदस्य निवडून आले आहेत. इथे काट्याची लढाई झाली. पण सरपंच ठाकरे गटाच्या शिवसेनेचा निवडून आला आहे. आज लागलेल्या निकालात २२ पैकी ११ ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाच्या शिवसेनेचे सरपंच निवडून आले आहेत, अशी माहिती ठाकरे गटाचे तालुका प्रमुख बंड्या साळवी यांनी दिली. यात कासारवेली, चांदोंर, टिके, तोंणदे, टेंबे, तरवळ, पूर्णगड फणसवळे, तरवळ मावळंगे, भगवती नगर, मालगुंड या ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाचे सरपंच निवडून आल्याचा दावा करण्यात आला आहे.

कोकणात उद्धव ठाकरे समर्थक राजन साळवींना धक्का; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात गणिते बदलली!

निवळी, नेरूळ करबुडे, बोंडये या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर गावडे आंबेरे ग्रामपंचायतीत जास्त सदस्य ठाकरे गटाच्या शिवसेनेचे निवडून आलेत. परंतु, सरपंचपदी हे भाजपचा उमेदवार निवडून आला आहे. दरम्यान, निवडून आलेल्या सर्व सदस्य व सरपंचांचा उद्या ठाकरे गटाच्या शिवसेनेतर्फे जाहीर सत्कार होणार असल्याचेही तालुकाप्रमुख बंडा साळवी यांनी सांगितले.

मायलेकी समोरासमोर, एकमेकींविरुद्ध लढवत आहेत ग्रामपंचायतीची निवडणूक, गुहागरमध्ये उत्सुकता शिगेला

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.