
Tej Police Times
कर्नाटकची मग्रुरी सुरूच; महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही
ठाकरेंच्या शिवसेनेनं सरकारला काय सल्ला दिला?
शाईफेकीच्या घटना आणि त्या टाळण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयावर टीकास्त्र सोडताना ‘सामना’तून सरकारला एक सल्लाही देण्यात आला आहे. ‘लोकशाही राज्यव्यवस्थेत सरकारने जनतेचा विश्वास संपादन करणे, जनतेला आपलेसे करणे आणि जनतेची मने जिंकणे अपेक्षित असते. पण महाराष्ट्रात तसे होताना दिसते आहे काय? सरकारचे वर्तन जनतेला सुखावणारे असायला हवे, तरच जनतेच्या मनातही राज्यकर्ते वा सरकारविषयी आपुलकी व ममत्वाची भावना वाढीस लागते. मात्र जनतेला सुखावणे तर दूरच, पण दुखावणारे वर्तन सरकार वा सत्तापक्षाच्या पुढाऱ्यांनी महाराष्ट्रात सुरू केले. आधी तोंडाला येईल ते बरळायचे, जनतेच्या मनातील श्रद्धास्थानांवर आघात करायचा, महापुरुषांची वाटेल तशी बदनामी करायची आणि नंतर धसका घेऊन शाईच्या पेनवर बंदी घालण्याचे भेदरट निर्णय घ्यायचे, यालाच राज्यकारभार म्हणावे काय? शाईवर किंवा पेनवर बंदी घालण्यापेक्षा शाईफेक होणारच नाही असा कारभार करायला काय हरकत आहे! बरे, विधिमंडळात शाईच्या पेनवर बंदी घातल्याने काय साध्य होणार आहे? सरकारला जनतेत मिसळावेच लागते. मंत्र्यांना, लोकप्रतिनिधींना जनतेत जाऊन संवाद करावाच लागतो. मग शाईच्या पेनवर अशी बंदी कुठे कुठे घालणार? त्यामुळे असे शाईबंदीचे उफराटे निर्णय घेण्यापेक्षा उफराटी विधाने करणाऱ्या पुढाऱ्यांच्या बेलगाम बोलण्यावर खरे तर बंदी घालायला हवी,’ असं ‘सामना’त म्हटलं आहे.
दरम्यान, आज हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून होणाऱ्या राजकीय हल्ल्यांना सत्ताधारी कसं प्रत्युत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.