
Tej Police Times
नागरिकांनी करोना लसीचा चौथा डोस घ्यावा का असा प्रश्न उपस्थित होत असताना एम्सचे माजी डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी यावर महत्त्वाचे भाष्य केलं आहे. नागरिकांनी लवकरात लवकर लशीचा बुस्टर डोस घेण्याची गरज आहे. केंद्र सरकारकडूनही बुस्टर डोसवर भर देण्यात येत आहे. लशीचा चौथ्या डोसबाबतही गुलेरिया यांनी माहिती दिली आहे. लशीच्या चौथ्य डोसबाबत अद्याप कोणताही डेटा समोर आलेला नाहीये. चौथा डोस घेण्याची इतक्यात गरज नाहीये. जोपर्यंत बायवेलेंट लस येत नाही तोपर्यंत चौथा डोस घेण्याची आवश्यकता भासणार नाही, असं गुलेरिया यांनी म्हटलं आहे.
वाचाः Corona virus : BF.7 किती धोकादायक? भारतात अलर्ट; राज्यांनी सुरू केली तयारी, लागू शकतात निर्बंध
बायव्हॅलेंट लस म्हणजे मूळ व्हायरसच्या स्ट्रेन कंपोनेंट आणि ऑमिक्रॉन व्हेरिंयटच्या एका कंपोनेंट मिळून तयार केली जाते. या व्हॅक्सीनमुळं संसर्गापासून अधिक सुरक्षा मिळते. दोन कंपोनंटमुळं या लसीला बायव्हॅलेंट असं म्हणतात. बायव्हॅलेंट लस कोविड-१९ बूस्टर डोसचं अपग्रेड व्हर्जन असल्याचंही बोलतात.
वाचाः नव्या व्हेरियंटमुळं टेन्शन, राज्य सरकारने उचलली गंभीर पावलं, कृतिगट स्थापन करणार
चिंता नको, काळजी घ्या
‘चीनमध्ये करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर भारतातील नागरिकांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही; मात्र, या आजाराचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी पूर्वीप्रमाणेच खबरदारी घेणे गरजेचे आहे,’ असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना व्यक्त केले.
वाचाः मुंबई ते पणजी प्रवास करा आता शिवशाहीने; उद्यापासून सेवा सुरू, भाडे फक्त…
Recover your password.
A password will be e-mailed to you.