
Tej Police Times
उत्तरेतील हिमवर्षावामुळे गारठा
उत्तर भारतातील पश्चिमी प्रकोपामुळे २३ ते २७ डिसेंबरदरम्यान महाराष्ट्रात काहीशी थंडी निर्माण झाली. सध्या तिथे दाट धुक्याची चादर असून याचा परिणाम महाराष्ट्रावर झाला आहे. या वातावरणामुळे राज्यातील थंडी काहीशी कमी झाल्याचे निवृत्त हवामान विभाग अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले. यानंतर पुन्हा पश्चिमी प्रकोपामुळे १ जानेवारी २०२३ पासून उत्तर भारतात हिमवर्षावाची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव थोडा वाढू शकेल अशी शक्यता त्यांनी वर्तवली. या काळात राज्यात महाराष्ट्राची पाऊस पडण्याची शक्यता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. थंडीचा प्रभाव राज्यात या काळात खूप तीव्र नसेल असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Recover your password.
A password will be e-mailed to you.