Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नववर्षाचे स्वागत थंडीने होण्याची शक्यता; पहिल्याच आठवड्यात गारठा वाढणार

20

Maharashtra Weather Forecast: राज्यामध्ये सध्या कोकण विभाग वगळता इतरत्र गारठा असला तरी एरवी डिसेंबरअखेरीस असणारी थंडी यंदा मात्र जाणवत नसल्याचे दिसत आहे. सरासरीपेक्षा किमान तापमान २ ते ३ अंशांनी अधिक आहे.

 

नववर्षाचे स्वागत थंडीने होण्याची शक्यता; पहिल्याच आठवड्यात गारठा वाढणार
नववर्षाचे स्वागत थंडीने होण्याची शक्यता; पहिल्याच आठवड्यात गारठा वाढणार
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः राज्यामध्ये सध्या कोकण विभाग वगळता इतरत्र गारठा असला तरी एरवी डिसेंबरअखेरीस असणारी थंडी यंदा मात्र जाणवत नसल्याचे दिसत आहे. सरासरीपेक्षा किमान तापमान २ ते ३ अंशांनी अधिक आहे. मात्र जानेवारीच्या सुरुवातीला पुन्हा एकदा थंडी वाढू शकेल असे अनुमान आहे. या काळात खूप तीव्र थंडी नसेल. सध्याच्या तुलनेत तापमानात घसरण होऊन थंडीची पुन्हा एकदा जाणीव होऊ शकेल.

मुंबईमध्ये शुक्रवारी गुरुवारच्या तुलनेत कमाल तापमान किंचित कमी झाले. किमान तापमानात शुक्रवारी फारसा फरक पडला नसला तरी शनिवारी आणि नव्या वर्षाच्या स्वागताला रविवारी १ जानेवारी रोजी किमान तापमानाचा पारा १५ ते १६ अंशांदरम्यान असू शकेल असे अनुमान भारतीय हवामान विभागाने वर्तवले आहे. मुंबईमध्ये कुलाबा येथे शुक्रवारी २१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर सांताक्रूझ येथे १८.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. तर कमाल तापमान कुलाबा येथे २९.६ आणि सांताक्रूझ येथे ३१.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. कुलाबा येथे गुरुवारी ३०.६ तर सांताक्रूझ येथे ३३.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. शुक्रवारी अधूनमधून गार वाऱ्यांची जाणीव झाल्यानंतर आता आज, शनिवारी किमान तापमानाचा पारा थोडा खाली येण्याची शक्यता आहे.

उत्तरेतील हिमवर्षावामुळे गारठा

उत्तर भारतातील पश्चिमी प्रकोपामुळे २३ ते २७ डिसेंबरदरम्यान महाराष्ट्रात काहीशी थंडी निर्माण झाली. सध्या तिथे दाट धुक्याची चादर असून याचा परिणाम महाराष्ट्रावर झाला आहे. या वातावरणामुळे राज्यातील थंडी काहीशी कमी झाल्याचे निवृत्त हवामान विभाग अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले. यानंतर पुन्हा पश्चिमी प्रकोपामुळे १ जानेवारी २०२३ पासून उत्तर भारतात हिमवर्षावाची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव थोडा वाढू शकेल अशी शक्यता त्यांनी वर्तवली. या काळात राज्यात महाराष्ट्राची पाऊस पडण्याची शक्यता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. थंडीचा प्रभाव राज्यात या काळात खूप तीव्र नसेल असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.