
Tej Police Times
राज्यातील राजकीय स्थिती, महागाई, भ्रष्टाचार, आगामी निवडणुकांची तयारी आणि ‘हात से हात जोडो’ अभियान यावर मंथन करण्यासाठी अभियानाचे प्रभारी माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. राज्याचे प्रभारी एच.के. पाटील, विधीमंडळातील पक्ष नेते बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण अनुपस्थित असल्याची चर्चा सुरू झाली.
भारत जोडो यात्रेला अभूतपूर्व यश लाभले. केंद्राच्या चुकीच्या धोरणाविरोधात जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी बुथ पातळीपर्यंत हात से हात जोडो अभियान राबवण्यात येईल, राज्य व केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध तसेच, संघटनात्मक कामाबाबत ठराव मांडण्यात येणार आहेत,असेही नाना पटोले यांनी सांगितले.
राज्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरण नियुक्त आयोगाऐवजी सर्वोच्च न्यायालयात सात सदस्यीय पीठासमोर आणावे, ही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती योग्य असल्याचे मत नाना पटोले यांनी बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. सत्तेतील काही सदस्य अपात्र ठरल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही होईल. अशा स्थितीत आयोगाने आपली कारवाई थांबवावी, असेही ते म्हणाले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.