
Tej Police Times
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना ते कॉमन मिनिमम प्रोगामवर चालत होतं. तीन भिन्न विचारसरणीचे पक्ष असतानाही हे सरकार उत्तमप्रकारे चालले. तेव्हा आमच्यात चांगला समन्वय होता. विरोधी पक्षात काम करतानाही हा समन्वय राहिला पाहिजे. तरच आम्ही पुढच्या लढाया एकत्र लढू शकतो. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यासाठी काँग्रेस पक्षाला दोष देता येणार नाही. पण नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध होणार नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.
नाशिकमध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवरुन झालेल्या गोंधळावर शिवसेनेचे (ठाकरे गट) मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पदवीधर आणि शिक्षकांना भाजपविरुद्ध रोष व्यक्त करायचा होता. भाजपला सुशिक्षित वर्गाचा अजिबात पाठिंबा नाही व सगळेच शिक्षित त्यांच्या भगतगणांत मोडत नाहीत, हे दाखवायची आयतीच संधी मिळाली होती. पण फासे उलटे पडताना दिसत आहेत. विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील गोंधळाचे चित्र समोर आले. या गोंधळास जबाबदार व्यक्ती कोण? की एकमेकांच्या पायात पाय अडकवून भाजपला मोकळे रान द्यायचे, असे आघाडीतील लोकांनी परस्पर ठरवून टाकले आहे का, असा खोचक सवाल सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Recover your password.
A password will be e-mailed to you.