
Tej Police Times
पोलिसांनी जाहीर केले आकर्षण बक्षीस
भागवत देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला पाच महिने होतायत. भागवत मोबाईल वापरत नसल्यामुळे तपासात अनेक अडचणी येत आहेत. तसेच या हत्या प्रकरणात आतापर्यंत २५ हून अधिक संशयित लोकांची कसून चौकशी झाली. तरीही पोलिसांना तपासात हत्येचा सुगावा लागला नाही. अखेर पोलिसांनी भागवत देशमुख हत्या प्रकरणात माहिती देणाऱ्या व्यक्तीला आकर्षण बक्षीस तसेच त्याचं नाव गुपित ठेवण्यात येईल, असे पातुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हरीश गवळी यांनी ‘मटा ऑनलाइन’शी बोलताना कळविले आहे.
भागवत २५ ऑगस्ट पासून होता बेपत्ता
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, भागवत देशमुख २५ ऑगस्ट २०२२ रोजी पासून बेपत्ता होता, त्याचा अनेक ठिकाणी शोध घेतला, मात्र कुठलाही सुगावा हाती लागला नव्हता. अखेरीस नातेवाईकांनी भागवत बेपत्ता असल्याची तक्रार खदान पोलीस ठाण्यात दाखल दिली. दरम्यान, ३१ ऑगस्टला पोलिसांनी नातेवाईकांना या संदर्भात माहिती दिली की भागवत याची हत्या झाली असून तेव्हा कुठलीही ओळख न पटल्याने पोलिसांकडून त्याच्यावर अंत्यविधी केले. हे समजताच कुटुंबीयांना धक्का बसला होता. दरम्यान भागवतच्या हत्या प्रकरणातील दोषींवर कठोर करावी करावी, अशी मागणीही नातेवाईकांनी केली.
आधी गळा आवळला, नंतर मृतदेह तलावात फेकला…
पातुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भागवत देशमुख याची अज्ञात व्यक्तींनी आधी गळा आवळून हत्या केली, त्यानंतर त्याचा मृतदेह तलावात फेकून दिला, असं वैद्यकीय अहवालात समोर आला आहे. त्यानुसार अज्ञात आरोपींच्या विरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.
भागवत देशमुख नेमके कोण आहेत?
भागवत देशमुख सुरुवातीला शिवसेनेचे अकोल्याचे माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांचे वाहन चालक म्हणून होते. दरम्यान, काही वर्षानंतर भागवतने आपला प्रवास राजकीय क्षेत्रात वळविला. २३ ऑगस्ट २०२२ रोजी अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात भागवतने प्रवेश केला. शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरीया यांच्या निवासस्थानी त्याने जाहीर प्रवेश केला होता. त्याच्या खांद्यावर शिंदे गटातील शिवसेना उपशहर प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली होती. प्रवेशानंतर दोन दिवसातच त्याची हत्या झाली.
Recover your password.
A password will be e-mailed to you.