
Tej Police Times
आंबेडकर म्हणाले, “राजकारणात कोणताही पक्ष कुणाचाही कायमस्वरुपी दुश्मन नाही. भारतीयांमध्ये टोकाचे मतभेद असू शकतात पण दुश्मनी असू शकत नाही. आरएसएस आणि भाजपशी आमचे टोकाचे मतभेद आहेत. मी अनेकवेळा जाहीर मंचावरुन ते मांडलेही आहेत. पण भाजप आजही मनुस्मृती मानते. आमचा लढा मनुस्मृतीच्या विरोधात आहे. भारतीय जनता पक्ष जर मनुस्मृती सोडून घटनेच्या चौकटीत काम करायला तयार असेल तर आम्ही त्यांच्या सोबत घरोबा करु शकतो”
मनृस्मृती सोडायची म्हणजे काय करायचं? महाडला बाबासाहेब आंबेडकर यांनी जशी मनुस्मृती जाळली होती, तेच मोहन भागवत यांनी नागपूरला करावं. मनुस्मृती हा धर्मग्रंथ नाही. ती हिंदू धर्मातील सामाजिक, राजकीय व्यवस्था कशी असावी हे सांगणारा ग्रंथ आहे. त्यात भाजप, संघ बदल करणार असेल. तर त्याचं स्वागत करू, असंही आंबेडकर म्हणाले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.