
Tej Police Times
भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावेळी राज्यपाल पदावरुन पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मला उर्वरित आयुष्य वाचन, मनन आणि चिंतनात व्यतीत करायचे असल्याचे त्यांनी पंतप्रधान मोदी यांना सांगितले होते. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या जागी महाराष्ट्राचा नवा राज्यपाल म्हणून कोणाची नेमणूक होणार, याबद्दल चर्चा सुरु झाली होती. त्यांच्याजागी पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि माजी काँग्रेस नेते कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder singh) यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.
कोश्यारी आणि वाद! मोदींजवळ पदमुक्त होण्याची इच्छा मांडणाऱ्या राज्यपालांची वादग्रस्त वक्तव्यं
पंतप्रधान मोदी यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी ७५ सदस्यीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत अनेक राज्यांमध्ये राज्यपाल आणि उपराज्यपालांच्या बदल्या आणि नियुक्त्यांसंदर्भात चर्चा होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात येत्या १५ दिवसांत नव्या राज्यपालांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. राजस्थान भाजपमधील ज्येष्ठ नेते ओम माथुर, कॅप्टन अमरिंदरसिंग, प्रभात झा आणि लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची नावे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाच्या शर्यतीमध्ये आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Recover your password.
A password will be e-mailed to you.