Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Success Story: ऐकू येत नसल्याने शिपायाची नोकरीही मिळेना, परिस्थितीवर मात करत बनला आयएएस

14

IAS Success Story: प्रत्येक आयएएस अधिकाऱ्याच्या संघर्षाची कहाणी प्रेरणादायक असते. काहींनी चहा विकला तर काहींनी कुली म्हणून काम केले. पण आज आम्ही तुम्हाला अशाच एका आयएएस अधिकाऱ्याची गोष्ट सांगणार आहोत, ज्याने कधी शिपायाची नोकरी मागितली तर बीडीओने त्यांना शिपायाची नोकरी देण्यास नकार दिला.

आयएएस अधिकारी मणिराम शर्मा यांची कहाणी आपण जाणून घेत आहोत. मणिराम शर्मा हे राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील बंदनगढ़ी गावचे रहिवासी आहेत. मणिरामचे वडील मोलमजुरी करायचे तर आईला दृष्टी नव्हती. एवढेच नव्हे तर मणिराम यांना स्वतःलाही ऐकू येत नव्हते. त्यांना अभ्यासाची खूप आवड होती पण गावात शाळा नसल्याने अभ्यास करणे खूप अवघड होते. अभ्यासासाठी ते दररोज ५ किलोमीटर चालत शाळेत जायचे.

मेहनतीचे फळ गोड असते, असे म्हणतात. मणिराम यांनी प्रचंड मेहनत घेत अभ्यास केला. त्यावेळी त्यांनी राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षेत पाचवा आणि बारावीच्या परीक्षेत सातवा क्रमांक पटकावला होता. मणिराम दहावी पास झाल्याचे कळल्यावर त्यांच्या वडीलांवर खूप आनंद झाला. वडिलांनी मणिराम यांना आपल्या ओळखीच्या एका अधिकाऱ्याकडे नेले. माझा मुलगा दहावी पास झाला आहे, त्याला शिपाई म्हणून नोकरी द्या, असे त्यांनी अधिकाऱ्याला सांगितले. त्यावेळी अधिकाऱ्यांच्या बोलण्यानंतर मणिराम यांच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ते म्हणाले ‘मणिरामला ऐकू येत नाही. त्यामुळे घंटा किंवा कोणाचा आवाज त्याला ऐकू येणार नाही. तो शिपाई कसा बनू शकतो?’

Success Story: आई करते मोलकरीणीचं काम तर वडील शिपाई, मुलीला मिळाले २० लाखांचे पॅकेज

राज्यात लिपिक परीक्षा उत्तीर्ण

त्यानंतर त्यांनी अलवर कॉलेजमधून पुढील शिक्षण घेतले. मुलांची शिकवणी घेतली. त्यातूनच त्यांनी खर्च चालवला. लिपिकाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांना पीएचडी शिष्यवृत्ती मिळाली. त्यानंतर त्यांनी आयएएस होण्याचा निर्णय घेतला.

मणिराम यांनी २००५ मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. बहिरेपणामुळे त्यांना नोकरी मिळू शकली नाही. २००६ मध्ये पुन्हा परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांना पोस्ट आणि टेलिग्राफ खात्याची नोकरी मिळाली. दरम्यान कानाच्या ऑपरेशननंतर त्यांना ऐकू येऊ लागले. २००९ मध्ये त्यांनी पुन्हा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन ते आयएएस झाले.

Success Story: आईने मजुरी करुन शिकविले, मुलगी पहिल्याच प्रयत्नात बनली आयपीएस
Success Story: गरिबीमुळे शेतात राबली, परदेशी नोकरी नाकारुन शेतकऱ्याची मुलगी इल्मा बनली आयपीएस

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.