
Tej Police Times
संमेलन परिसरात आचार्य विनोबा भावे मुख्य सभामंडप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथप्रदर्शन, ग. त्र्यं. माडखोलकर प्रकाशन मंच, मनोहर म्हैसाळकर सभामंडप, प्रा. देविदास सोटे कविकट्टा, कविवर्य सुरेश भट गझल कट्टा, वा. रा. मोडक बालसाहित्य मंच, मावशी केळकर वाचनमंच सजले आहेत. कविकट्टा, गझलकट्टा, वाचनकट्टा, प्रकाशनकट्टा रंगणार आहे. बोली भाषांपासून समाज माध्यमांतील अभिव्यक्तीपर्यंत विविध विषयांवर तीन दिवसांमध्ये परिसंवाद रंगतील.
साहित्यनगरी २३ एकर परिसरामध्ये पसरली आहे. मुख्य प्रवेशद्वार सूत कातणाऱ्या महात्मा गांधींच्या प्रतिकृतीने सजले आहे. प्रवेशद्वारावर ‘सार्थ तुकाराम गाथा’, ‘सत्याचे प्रयोग’, ‘सार्थ श्रीज्ञानेश्वरी’, ‘विनोबा भावे’ या पुस्तकांची मुखपृष्ठे आहेत. संमेलनाच्या पूर्वसंध्येला भारत सासणे यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शन आणि प्रकाशन मंचाचे उद्घाटन झाले.
वर्ध्यात साहित्य संमेलन होत आहे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. लोकांच्या मनामध्ये गांधी आणि विनोबा भावे यांची स्मृती असणे ही अतिशय चांगली गोष्ट आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सांभाळणे म्हणजे एक जबाबदारीचे काम आहे.
– न्या. नरेंद्र चपळगावकर, नियोजित संमेलनाध्यक्ष
वादांची परंपरा कायम
– गांधीवादी संघटनांचा डावलल्याचा आरोप
– पूर्वसंध्येला ग्रंथप्रदर्शन आणि प्रकाशन मंचाचे उद्घाटन
– निघणार ग्रंथ दिंडी; सुरक्षेच्या कारणास्तव ऐनवेळी मार्ग बदलला
– उद्घाटन समारंभातून ‘वर्धा गौरव गीत’ बाद
Recover your password.
A password will be e-mailed to you.