
Tej Police Times
भारतचा अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचेपर्यंतच गावात दुसरी बातमी धडकली. गावातील आणखी तिघा जणांचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली. एकाच दिवशी अनेक कुटुंबांवर काळाने घात घातला होता. कारण या कुटुंबातील कर्ते पुरुषच मृत्युमुखी पडले होते.
लहानेवाडी येथील लक्ष्मण सुभाष कापसे (वय ३६ वर्ष), नितीन भाऊसाहेब हुलगे (वय ३० वर्ष), अण्णा बळीराम खटके (वय २७ वर्ष) या तिघांचा तेलगाव येथील जिनिंग व मजुरीचे काम करून आपल्या गावी परतत असताना सायंकाळी मृत्यू झाला.
एकाच दुचाकीवर हे तिघे निघाले होते मात्र माजलगावकडून धारूरकडे जाणाऱ्या भरधाव कारने या दुचाकीला समोरासमोर जबर धडक दिली. यातील दोघांना चारचाकीने दूरपर्यंत फरपटत नेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान माजलगाव येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच दिंद्रुड पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र तोपर्यंत या अपघातातील तिघांची प्राणज्योत मालवली होती.
हेही वाचा : …तर हे माझा जीव घेतील, सुशांतचा आईला फोन ठरला अखेरचा, मृत्यूचं गूढ उलगडण्याच्या मार्गावर
ही बातमी गावात पोहोचली, तेव्हा गावात आधीच भारत गायकवाड या युवकावर अंत्यसंस्कार चालू होते. त्याच्या अंत्यविधीलाच या तीन युवकांच्या मृत्यूची बातमी पोहोचली. यामुळे लहाने वाडी या गावात एक नव्हे तर चार कुटुंबांवर काळाने मोठा घाला घातला. या चारही कुटुंबातील युवकांना लहान-लहान मुलं असल्याचं देखील गावकरी सांगत आहेत.
हेही वाचा : गर्लफ्रेण्ड दुसऱ्या पोराबरोबर दिसली, मुंबईकर तरुणाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात सगळं संपवलं
Recover your password.
A password will be e-mailed to you.