
Tej Police Times
कसबा पेठ मतदारसंघातील अनेक वर्षांची परंपरा मोडत भाजपने यंदा ब्राह्मण समाजाबाहेर उमेदवार दिला आहे. कसब्यात सध्या याचे तीव्र राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटताना दिसत आहेत. कसबा पेठ परिसरात अज्ञात व्यक्तींकडून लावण्यात आलेले बॅनर्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. ‘कुलकर्णींचा मतदारसंघ गेला… टिळकांचा मतदारसंघ गेला… आता नंबर बापटांचा का ? समाज कुठवर सहन करणार ?’ अशा आशयाचे बॅनर कसब्यात लागले आहेत. या बॅनरवर कोणाचेही नाव नसून कसब्यातील एक जागरूक मतदार इतकेच लिहलेले आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Recover your password.
A password will be e-mailed to you.