
Tej Police Times
दरम्यान, हेमंत रासने यांच्या उमेदवारी नंतर कसब्यात भाजपचा पारंपरिक मतदार असलेला ब्राम्हण समाज नाराज झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याच अनुषंगाने कसब्यात बॅनर लावण्यात आले असून या बॅनरच्या माध्यमातून ब्राम्हण समाजावर अन्याय झाल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.
‘कुलकर्णींचा मतदारसंघ गेला… टिळकांचा मतदारसंघ गेला… आता नंबर बापटांचा का ? समाज कुठवर सहन करणार ?’ अशा आशयाचे बॅनर कसब्यात लागले आहेत. या बॅनरवर कोणाचेही नाव नसून कसब्यातील एक जागरूक मतदार इतकेच लिहलेले आहे.
कसब्यातील ब्राह्मण मतदार नाराज, भाजपला धडा शिकवण्यासाठी पुण्यातील ‘ही’ बहुचर्चित व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात
शैलेश टिळक यांच्या नाराजीमुळे कसब्यातील भाजपचा हक्काचा मतदार असलेला ब्राह्मण समाज प्रचंड नाराज झाल्याची चर्चा आहे. याची दखल आता भाजपकडून घेण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सोमवारी संध्याकाळी केसरीवाडा येथे शैलेश टिळक यांच्या भेटीसाठी पोहोचले. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून टिळक कुटुंबीयांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक यांची सध्या काही नेत्यांसोबत अज्ञातस्थळी बैठक सुरु आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
कसबा पोटनिवडणुकीत ब्राह्मण समाज नाराज झाल्याने हिंदू महासंघाने भाजपविरोधात दंड थोपटले आहेत. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे मंगळवारी कसबा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरणार आहेत. त्यांनी आज केसरीवाडा येथे जाऊन टिळक कुटुंबीयांची भेट घेतली. तत्पूर्वी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनीही आज सकाळी टिळक कुटुंबीयांची भेट घेत मुक्ता टिळक यांची अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Recover your password.
A password will be e-mailed to you.