
Tej Police Times
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी बाळासाहेब थोरात यांना एकटे खिंड लढविलेले बाजीप्रभू म्हटले गेले होते. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ४४ जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांचे दिल्लीच्या वर्तुळातील राजकीय वजन वाढले होते. महाविकास आघाडी स्थापन करण्यात त्यांची मोठी भूमिका राहिली. हे अन्य काँग्रेस नेत्यांना असुरक्षित वाटले. त्यामुळे थोरात विरोधी गटाकडून आता सत्यजित तांबे यांच्यानिमित्ताने त्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. २०१९ मध्ये मविआची सत्ता आल्यानंतर नाना पटोले यांना मंत्रिपद हवे होते. पण बाळासाहेब थोरात यांनी पटोले यांना विधानसभा अध्यक्ष करुन एकप्रकारे त्यांचे पंख छाटले होते. नंतरच्या काळात नाना पटोले यांनी मंत्रिपदासाठी विधानसभेचे अध्यक्षपद सोडले. पण त्यांना मंत्रिपद काही मिळाले नाही. याच गडबडीत भाजपने नव्या विधानसभा अध्यक्षाची निवड होऊन दिली नाही. याच त्रुटीचा फायदा घेऊन शिंदे-फडणवीसांनी सत्ता काबीज केली होती.
काँग्रेसला सोयीनुसार वापरण्यापेक्षा…; पक्षांतर्गत संघर्षाने व्यथित थोरातांना विखेंनी डिवचले, केला थेट सवाल
यापूर्वी शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील परस्पर सहकार्याची भूमिका कायम चर्चेचा विषय असायची. त्यामुळे बाळासाहेब थोरात हे राष्ट्रवादीच्या जवळचे आहेत, असा आरोप कायम व्हायचा. बाळासाहेब थोरात हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळचे आहेत, या आरोपामुळे त्यांचे प्रदेशाध्यक्षपद गेले होते. परंतु, गेल्या काही महिन्यांमध्ये हे चित्र पूर्णपणे बदलले आहे, नगरमधील राजकारणाचा लंबक विरुद्ध टोकाला जाताना दिसत आहे. शरद पवारांच्या जवळचे म्हणता म्हणता आता बाळासाहेब थोरात भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. पण राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये असल्याने थोरात यांना पक्षात सामावून घेण्यात अडचण येऊ शकते. पण राष्ट्रवादी काँग्रेस विखेंना शह देण्यासाठी बाळासाहेब थोरात यांना पुढे करत असल्याची चर्चा आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.