Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

खिंड सोडून पळाले; बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यावर विखे-पाटलांची बोचरी टीका

18

अहमदनगर: २०१९ साली काँग्रेस वाचविण्यासाठी मी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका बजावणार, असे सांगणारे आणि एकाकी खिंड लढवणार म्हणवून मिरवून घेणारे आता हतबल का झाले ? खिंड लढवायची सोडून त्यांनी पळ काढण्यात समाधान मानले आहे, अशी उपरोधिक आणि घणाघाती टीका करीत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी थोरातांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजीनामा नाट्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणूक निकालानंतर राज्यात विविध राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्यातील या घडामोडींबद्दल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माध्यमाशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की, नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्ष नेते पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा पाठविण्याची भाषा करतात. त्यांचे प्रदेशाध्यक्षांशी जमत नाही म्हणून सांगतात. या बऱ्याच गोष्टींचे आश्चर्य वाटते. नाशिक पदवीधर मतदारसंघात महविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार होता आणि काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. पण काँग्रेसने महविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी का प्रयत्न केला नाही, हा मोठा प्रश्न सर्वांना पडला आहे. असे विखे पाटील म्हणाले.
Balasaheb Thorat: बाळासाहेब थोरात म्हणजे ‘आपला माणूस, आपला स्वाभिमान’, इंदुरीकर महाराजांकडून कौतुक
काँग्रेसमध्ये देखील तुम्हाला कुणी विचारत नाही. तुम्ही देशातील अध्यक्षांकडे जाऊन भांडा किंवा महाराष्ट्राचे जे प्रभारी असतील त्यांच्याकडे जाऊन भांडा, परंतु पक्षाचा अंतर्गत वादाचा परिणाम महाविकास आघाडीवर झालेला आहे. त्याची जबाबदारी ते घेणार की नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले.

नाना पटोले Vs बाळासाहेब थोरात नेमका वाद काय?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी बाळासाहेब थोरात यांना एकटे खिंड लढविलेले बाजीप्रभू म्हटले गेले होते. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ४४ जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांचे दिल्लीच्या वर्तुळातील राजकीय वजन वाढले होते. महाविकास आघाडी स्थापन करण्यात त्यांची मोठी भूमिका राहिली. हे अन्य काँग्रेस नेत्यांना असुरक्षित वाटले. त्यामुळे थोरात विरोधी गटाकडून आता सत्यजित तांबे यांच्यानिमित्ताने त्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. २०१९ मध्ये मविआची सत्ता आल्यानंतर नाना पटोले यांना मंत्रिपद हवे होते. पण बाळासाहेब थोरात यांनी पटोले यांना विधानसभा अध्यक्ष करुन एकप्रकारे त्यांचे पंख छाटले होते. नंतरच्या काळात नाना पटोले यांनी मंत्रिपदासाठी विधानसभेचे अध्यक्षपद सोडले. पण त्यांना मंत्रिपद काही मिळाले नाही. याच गडबडीत भाजपने नव्या विधानसभा अध्यक्षाची निवड होऊन दिली नाही. याच त्रुटीचा फायदा घेऊन शिंदे-फडणवीसांनी सत्ता काबीज केली होती.

काँग्रेसला सोयीनुसार वापरण्यापेक्षा…; पक्षांतर्गत संघर्षाने व्यथित थोरातांना विखेंनी डिवचले, केला थेट सवाल

राजकारणाचा लंबक विरुद्ध टोकाला, एकेकाळी राष्ट्रवादीच्या जवळ असलेले बाळासाहेब थोरात भाजपच्या जवळ असल्याची चर्चा

यापूर्वी शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील परस्पर सहकार्याची भूमिका कायम चर्चेचा विषय असायची. त्यामुळे बाळासाहेब थोरात हे राष्ट्रवादीच्या जवळचे आहेत, असा आरोप कायम व्हायचा. बाळासाहेब थोरात हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळचे आहेत, या आरोपामुळे त्यांचे प्रदेशाध्यक्षपद गेले होते. परंतु, गेल्या काही महिन्यांमध्ये हे चित्र पूर्णपणे बदलले आहे, नगरमधील राजकारणाचा लंबक विरुद्ध टोकाला जाताना दिसत आहे. शरद पवारांच्या जवळचे म्हणता म्हणता आता बाळासाहेब थोरात भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. पण राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये असल्याने थोरात यांना पक्षात सामावून घेण्यात अडचण येऊ शकते. पण राष्ट्रवादी काँग्रेस विखेंना शह देण्यासाठी बाळासाहेब थोरात यांना पुढे करत असल्याची चर्चा आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.