
Tej Police Times
Ind vs Aus 1st Test Live Score: पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला बसला दणका, १७७ वर ऑलआउट, जडेजाने घेतल्या ५ विकेट
“युवकांचा रोजगार आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाई खोके गँगने हिरावली आहे. खोके गँग ही महाराष्ट्रद्वेषी आहे, टक्केवारीत अडकली आहे”, अशी सडकून टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
पैठण शहरात लावलेले स्पीड ब्रेकर आपलं सरकार आल्यावर सपाट करून टाकू आणि महाराष्ट्राची विकासकामे गतिमान करू,असं आदित्य ठाकरे म्हणाले. निवडणुका लागतील तेव्हा संपूर्ण वातावरण भगवेमय होणार असल्याचा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
“युवकांचा रोजगार आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाई खोके गँगनी दिली नाही. हे आव्हान न स्वीकारणारी खोके गँग आहे”, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. “मविआ सरकारच्या काळात आम्ही महाराष्ट्र पुढे नेत राज्याला सुवर्णकाळ दाखवण्याचा प्रयत्न करत असताना राक्षसी महत्त्वाकांक्षी असणाऱ्यांनी सरकार पाडलं”, असा आरोप देखील आदित्य ठाकरेंनी केला.
हिंडेनबर्गने आणखी एक बॉम्ब टाकला; यावेळी अदानींचे काय होणार? संस्थापक म्हणाले…
न्याय आपल्या बाजूनेच होणार आणि ४० गद्दार हे राजकारणातून हद्दपार होणार आहेत, असं आदित्य ठाकरे म्हणाले. सत्तामेव जयतेला महत्त्व नाही तर सत्यमेव जयतेला शिवसेना महत्त्व देते, असं आदित्य ठाकरे म्हणाले. कृषी आणि उद्योग हे डबल इंजिन आपल्याकडे आहे. मात्र, ओला दुष्काळ जाहीर करा नाही तर खुर्च्या खाली करा या आमच्या मागणीनंतरही सत्ताधारी हे खुर्च्यांना चिकटून राहिले त्यामुळे त्यांना ओला दुष्काळ दिसला नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. मविआ सरकारच्या काळात मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे असताना कोणत्याही जाचक अटींशिवाय सरसकट मदत ही शेतकऱ्यांना देण्यात आली होती याची एकदा आठवण आदित्य ठाकरे यांनी शेतकरी बांधवांना करून दिली.
क्रिकेटपटूच्या निधनानंतर ११ महिन्यानंतर समोर आली १२० कोटींची संपत्ती; कोणाला काय मिळणार?
Recover your password.
A password will be e-mailed to you.