
Tej Police Times
शालान्त परीक्षा महत्त्वाची असली तरी ते सर्वस्व नाही, ही गोष्टही लक्षात घ्या. आमच्यासाठी तुम्ही सर्वांत महत्त्वाचे आहात. परीक्षेतील यश-अपयश या फारच दुय्यम गोष्टी आहेत, अपयशामुळे सर्व काही संपत नाही. परीक्षा अत्यंत तणावमुक्त व पारदर्शक वातावरणात घेण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत.
मंडळाने यापूर्वीच जाहीर केल्यानुसार परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदर पोहोचा. विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणात परीक्षेस सामोरे जाण्यासाठी राज्य मंडळ; तसेच विभागीय मंडळ स्तरावर आणि राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेकडून तज्ज्ञ समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेल्पलाइन सुविधाही उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनो, कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नका. परीक्षेच्या काळात मोबाइलवर व्हायरल होणाऱ्या चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नका.
सोशल मीडियावर पेपर फुटला किंवा पेपर पाहिजे असे संदेश फिरत असल्यास आमच्याशी संपर्क साधा.
या प्रकारच्या बातम्या जाणून बुजून पेरल्या जातात. अशा बेजबाबदार कृत्यांमुळे तुमच्या मनात गोंधळ निर्माण होऊ शकतो.
परीक्षा काळात फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. येणारा काळ तुमचाच आहे, याची मला खात्री आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाचे भविष्य आहात, त्याचबरोबर देशाचे व जगाचे नेतृत्व करण्याची धमक तुमच्यामध्ये आहे.
HSC Exam: इंग्रजीनंतर आता हिंदीच्या पेपरमध्येही घोळ, बारावीचे विद्यार्थी गोंधळात
HSC Exam: कॉम्प्युटर टेक्नोलॉजीची प्रश्नपत्रिका मराठीऐवजी इंग्रजीतून,अनुवाद करण्यात गेला विद्यार्थ्यांचा वेळ
Recover your password.
A password will be e-mailed to you.