
Tej Police Times
सिवा यांच्या प्रश्नावर सरकारने सांगितले की, २०१८ ते २०२३ या कालावधीत ६,९०१ ओबीसी विद्यार्थी, ३,५९६ एससी विद्यार्थी आणि३,९४९ एसटी विद्यार्थी केंद्रीय विद्यापीठातून बाहेर पडले. म्हणजेच त्यांनी आपला अभ्यास मधेच सोडला आहे. त्याचप्रमाणे २,५४४ ओबीसी विद्यार्थी, १,३६२ एससी आणि ५३८ एसटी विद्यार्थ्यांनी आयआयटीचा अभ्यास अर्धवट सोडला. याशिवाय, गेल्या पाच वर्षांत १३३ ओबीसी, १४३ एससी आणि ९० एसटी विद्यार्थ्यांनी आयआयएमसारख्या प्रतिष्ठित संस्थांमधून शिक्षण सोडले आहे.
तथापि, फी कमी करणे, अधिक संस्थांची स्थापना, शिष्यवृत्ती, आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्तीला प्राधान्य देणे यासारखी अनेक पावले सरकारने उचलली. एससी/एसटी विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आयआयटीमधील ट्यूशन फी माफ करणे’ यासह इतरही अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
Recover your password.
A password will be e-mailed to you.