
Tej Police Times
निकाल विलंबाच्या कारणाचा विद्यापीठाने शोध घेतला असता काही महाविद्यालये व प्राध्यापक मूल्यांकनात सहभागीच होत नाहीत असे दिसून आले. विद्यापीठाने त्या महाविद्यालयास व त्या प्राध्यापकांना वारंवार सूचना देऊनही मूल्यांकनाच्या बाबतीत ही महाविद्यालये व प्राध्यापक विद्यापीठाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम निकाल विलंबाने जाहीर होण्यावर होतो.
महाविद्यालयाने आणि प्राध्यापकांनी मूल्यांकन करणे हे कायद्यानुसार बंधनकारक आहे. म्हणूनच अशा महाविद्यालयावर व प्राध्यापकावर महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार कारवाई करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. लवकरच अशा महाविद्यालयांना व प्राध्यापकांना पत्र पाठवण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.