
Tej Police Times
या पुरस्कारांच्या निवडीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. समितीच्या शिफारसीनंतर साहित्य अकादमीच्या युवा साहित्य पुरस्कारासाठी ‘देवबाभळी’च्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
राज्य सरकारी अधिकाऱ्यांसाठी ठाकरे मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
नाशिकचे रंगकर्मी प्राजक्त देशमुख लिखित आणि दिग्दर्शित ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाला रंगभूमीवरही चांगला प्रतिसाद मिळाला.
नेमकं कसं आहे देवबाभळी नाटकाचं कथानक?
संगीत देवबाभळी नाटकाच्या कथानकाचे सर्वत्रच कौतुक झाले. यात तुकोबांना शोधत त्यांची पत्नी आवली भटकत असते, तेव्हा तिच्या पायात देवबाभळीचा काटा घुसतो आणि तिची शुद्ध हरपते. तेव्हा तिच्या पायातला काटा काढायला साक्षात विठ्ठल अवतरतो अशी एक वदंता आहे. त्या काट्याच्याच नावाचे हे नाटक विठ्ठलाने आवलीच्या पायातला काटा काढल्यानंतर काय घडले असेल याचा वेध घेते.
विठ्ठल काटा काढून थांबत नाही. या जखमेचे निमित्त करून विठ्ठल रखमाईला आवलीची काळजी घ्यायला पाठवतो. दोन बायका एकत्र आल्या की गोंधळ उडतो; मात्र येथे या दोघी एकमेकींचा आणि पर्यायाने तुकारामांचा, विठ्ठलाचा, भक्तिपरंपरेचा, आस्तिक्याचा वेध घेतात. असे हे नाटक आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.