
Tej Police Times
अजान देत असतानाच निवृत्त पोलीस अधिकऱ्याची हत्या, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे कृत्य
रविवारी सकाळी जलसंपदा विभागाने जारी केलेल्या आकडेवारीने राज्यातील नागरिकांच्या चिंतेत भर टाकली. राज्यातील एकूण २,९९४ लहान-मोठ्या धरणांतील जलसाठ्याची आकडेवारी पाहता नववर्षात पाणीप्रश्न पेटणार हे निश्चित समजले जात आहे. सद्यस्थितीत राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून ६३ टक्के इतकाच जलसाठा उपलब्ध आहे. यात छत्रपती संभाजीनगर विभागाची स्थिती सर्वांत बिकट असून मोठ्या, मध्यम आणि लहान धरणांमध्ये केवळ ३६.७१ टक्के पाणीसाठा आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्वांत मोठे धरण असलेल्या जायकवाडी धरणात केवळ ४३.३९ टक्के पाणीसाठा आहे. उजनी धरणातही केवळ १८.४३ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे.
नागपूर विभागातील एकूण ३८३ धरणांमध्ये ६८.३६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्वाधिक पाणीसाठा कोकण विभागात असून, यामध्ये ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग भागातील धरणांचा समावेश होतो. राज्यातील पाणीसाठा चिंताजनक असला, तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा तुलनेने समाधानकारक आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा (९७.१३ टक्के) भातसा (७७.५५ टक्के), मोडकसागर (६६.७५ टक्के), मध्य वैतरणा (४६.४८ टक्के) आणि तानसा (७८.२४ टक्के) आदी धरणांमध्ये जवळपास सरासरी ७८ टक्के पाणीसाठा आहे. यामुळे मुंबईकरांपुढे सध्यातरी पाणीकपातीची समस्या नसली तरी नजीकच्या काळात हे संकट ओढावण्याची दाट शक्यता आहे.
‘लाँग विकेंड’साठी मुंबईकरांची मुंबईबाहेर धाव, एक्सप्रेस वे, गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा
राज्यातील पाणीसाठा
धरण-सध्याच्या जलसाठा-मागील वर्षी याचवेळची टक्केवारी
उजनी-१८.४३टक्के-१००टक्के
जायकवाडी-४३.३९ टक्के-९१.७७ टक्के
गोसिखुर्द-५०.४४ टक्के-५८.०५ टक्के
तोतलाडोह-७४.४२ टक्के-८२.८२ टक्के
इसापूर-७६.३६ टक्के-९१.३९ टक्के
कोयना-७६.०५ टक्के-८५.८५ टक्के
दिवाळीच्या तोंडावर कोल्हापुरात पाणीटंचाई; जल अभियंत्याच्या घरासमोरच सामाजिक कार्यकर्त्याचं अभ्यंगस्नान
Recover your password.
A password will be e-mailed to you.