
Tej Police Times
‘दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा ‘इन्सानियत (मानवता), जम्हूरियत (लोकशाही) आणि काश्मिरीयत’ (काश्मिरींची ओळख) हा सिद्धांत काश्मिरी जनता आजही विसरलेली नाही. त्यांच्या कारकिर्दीत काश्मिरात वातावरण चांगले होते, तसेच पाकिस्तानसोबतही शस्त्रबंदी झाल्याने नाते सुधारत होते. मात्र, ही प्रक्रिया खंडित झाली. आता जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. देशातील इतर राज्यांप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाहीचे पुनरुज्जीवन झाले पाहिजे. त्यासाठी तेथील राजकीय पक्षांसोबत संवाद झाला पाहिजे,’ असेही ते म्हणाले.
‘काश्मीर प्रश्न खऱ्या अर्थाने सोडवायचा असेल, तर प्रत्यक्ष ताबा रेषेला (एलओसी) आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून घोषित केले पाहिजे, काश्मिरींना दोन्ही देशात प्रवासाची सुविधा असली पाहिजे, त्यासाठी दोन्ही देशांच्या सरकारांमध्ये हिंमत हवी.’ – अमरजित सिंह दुलत, ‘रॉ’चे माजी प्रमुख
दुलत म्हणाले :
– ‘कलम ३७०’ हटविण्याचे काम जम्मू-काश्मीरच्या विधानसभेच्या माध्यमातूनही करता आले असते.
– एखादा देश दिवाळखोरीत जातो, तेव्हा तो दहशतवाद पेरण्याचे काम करतो, पाकिस्तानची स्थिती अशी झाली आहे.
– केंद्र सरकारला जोपर्यंत काश्मीरवर नियंत्रण ठेवायचे आहे, तोपर्यंत तेथे निवडणुका होणार नाहीत.
– गुप्तचर यंत्रणांवर सरकारचे वर्चस्व कायमच राहिले आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.