
Tej Police Times
या मेसेजला तात्काळ देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिसाद मिळाला आणि फडणवीस आणि सूत्र हलवली परळी संच खाजगी सचिव दिलीप राजूरकर आणि दिल्लीतील मनोज मुंडे यांनी भाविकांशी संपर्क साधला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीमने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नेपाळचे असलेले माजी स्वीय सहाय्यक संदीप राणा यांना कळवले, त्यानंतर तातडीने राणा यांनी सर्व भाविकांची भेट घेतली. व सगळे भाविकांची व्यवस्था केली त्यानंतर एका विशेष बसने या सगळ्या भाविकांना गोरखपूर येथे पोहोचवण्यात आले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना संपर्क साधून त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली.
आता या भाविकांना मुंबईपर्यंत आणण्याचा मोठा प्रश्न होता त्यानंतर फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना संपर्क साधून पत्र लिहून गोरखपुर वरून मुंबई पर्यंत रेल्वेला खास बोगी जोडण्याची विनंती केली त्यानंतर रेल्वेने गोरखपुर वरून मुंबई पर्यंत प्रवासासाठी खास बोगी जोडून आरक्षित करून दिली त्यानंतर सगळे भाविक दोन दिवस प्रवास करून सुखरूप आपल्या घरी पनवेल कामोठे येथे पोहोचले. या सगळ्या बाका प्रसंगात देवदूत म्हणून धावून आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव या सगळ्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
Recover your password.
A password will be e-mailed to you.